सोलापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांत जागरूकता महत्त्वाची असून त्यांनी स्वत:सह गावची काळजी यावी. नागरिकांनी जागरूकता दाखविल्यास आपण कोरोनावर निश्चित मात करू, असा विश्वास माजी आमदार दिलीप माने यांनी व्यक्त केला.
तिर्हे (ता. उत्तर सोलापूर) येथील सिद्धिविनायक प्रतिष्ठान व ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. तिऱ्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना पीपीई किट, मास्क व हॅंडग्लोज वाटप करण्यात आले. माजी आमदार माने म्हणाले, कोरोनाचे भयावह संकट आल्याने आपण अडीच महिने लॉकडाउन होतो. शासन, प्रशासन प्रादुर्भाव रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, आता नागरिकांनी जागरूक राहून स्वत:सह कुटुंबाची व गावची काळजी घेणे आवश्यक आहे. मास्कचा वापर करणे, साबणाने वारंवार हात धुणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, सर्दी, ताप, खोकला जाणवल्यास डॉक्टरकडून तपासणी करून घेणे याचा अवलंब केल्यास आपण कोरोनावर मात करू शकणार आहोत.
यावेळी बाळासाहेब सुरवसे, सोसायटीचे अध्यक्ष भास्कर सुरवसे, तंटामुक्त अध्यक्ष अरविंद जाधव, शिवाजी सुरवसे, सरपंच संजय राठोड, उपसरपंच गोवर्धन जगताप, सदस्य अजय सोनटक्के, वैद्यकीय अधिकारी गोडसे, बाळासाहेब काळजे, गुरुदेव गायकवाड, बिभिषण मल्लाव, संजय गवळी, दादासाहेब मल्लाव, दीपक मल्लाव यांच्यासह सिद्धिविनायक मंडळाचे पदाधिकारी, नागरिक, युवक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.