dharan.jpg 
सोलापूर

दमदार पावसाने भाटघर, वीर व नीरा देवघर धरणाच्या पाणी साठ्यात वाढ 

मिलिंद गिरमे

लवंग(सोलापूर)ः भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या नीरा उजवा कालव्यावरील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, माळशिरस आणि सातारा जिल्ह्यातील फलटण या तालुक्‍यांमध्ये पडत असलेल्या दमदार पावसामुळे सिंचनासाठी कालव्याचे पाणी बंद करून तलाव भरले जात आहेत. या तालुक्‍यात परतीचा पाऊस पडत असतो परंतु यंदा मेच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पावसाने हजेरी लावल्याने धरणाच्या पाणी साठयात वाढ होऊ लागली आहे. 

मागील वर्षी धरणे भरल्यामुळे यंदाचा उन्हाळा जाणवलाच नाही. या वर्षी जून महिन्यात आणि आज 11 जुलै पर्यंत पावसाने धडाकेबाज हजेरी लावलेली आहे. तालुक्‍यात एक जून पासून 11 जुलैपर्यंत 14 इंच ते काही भागात 15 इंचाचा टप्पा गाठला. गतवर्षी याच कालावधीत फक्त दीड ते दोन इंचच पाऊस झाला होता. गतवर्षी लाभक्षेत्रात उशिरा पाऊस चालू झाला असला तरी धरणांवर लवकर पाऊस चालू झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत गेली होती. 


यंदा धरणावर कमी पाऊस आहे परंतु लाभक्षेत्रात मात्र चांगला पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. 
नीरा उजवा कालव्यातून पाणी चालू आहे. परंतु पिकांचे सिंचनाचे पाणी बंद करून ते आता माळशिरस तालुक्‍यातील निमगाव, उघडेवाडी, फोंडशिरस, गिरझणी तलावात पाणी सोडले जात असल्याने उघडेवाडी व गिरझणी तलाव भरले आहेत. पंढरपूर तालुक्‍यातील मोठे असणारा तिसंगी तलाव यामध्येही पाण्याचा साठा होण्यास सुरवात झाली आहे. 

सत्तांतर होताच पाणी वाटपातील नियमात बदल 
वीर, भाटघर आणि देवघर धरणांच्या पाणीसाठ्यातून नीरा उजवा कालवा आणि नीरा डावा कालवा यांना प्रकल्प अहवालानुसार जे पाणी वाटप केले गेले होते त्यामध्ये नीरा डावा कालव्याला कॉंग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असताना उजव्या कालव्याला वाटपाचे आलेल्या हिश्‍यातून पाणी घेतले होते. भाजप सरकारच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी नीरा उजवा कालव्याला परत पाणी वाढवून दिले. दरम्यान राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेनेचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी पुन्हा उजवा कालव्याला दिलेले पाणी डाव्या कालव्याला वळवल्याने राज्यात मोठी चर्चा रंगली होती. मात्र या राजकारणाचा उजव्या कालव्यावरील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात ज्यावेळी पाणी कमी पडेल त्या वेळेस फटका बसणार आहे. 


धरणातील झालेला पाणी साठा 
भाटघर- 30.12 टक्के 
वीर - 38.69 टक्के 
नीरा-देवघर- 14.39 टक्के 

संपादनः प्रकाश सनपूरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT