Accident News esakal
सोलापूर

Mohol Accident : मोटरसायकल व एसटी अपघात मोटरसायकल स्वाराचा मृत्यू

मोटरसायकल व एसटी यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला.

राजकुमार शहा

मोहोळ - मोटरसायकल व एस टी यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शेटफळ- पंढरपूर या महामार्गावरील आष्टी ता मोहोळ गावच्या शिवारात सकाळी पावणे बारा वाजता झाला. भारत बाजी सुरवसे वय 65 रा नजीक पिंपरी ता मोहोळ असे मृत इसमाचे नाव आहे. या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात झाली आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मृत भारत सुरवसे हे मोटरसायकल क्र एम एच 13 एल 5250 वरून पंढरपूरहुन शेटफळेच्या दिशेने येत होते, तर एस टी क्रमांक एम एच 14 बी टी 4575 ही बार्शीहून पंढरपूरकडे निघाली होती.

दोन्ही वाहने आष्टी शिवारातील एका हॉटेल जवळ येताच त्यांची समोरासमोर धडक झाली. धडक होताच भारत सुरवसे यांच्या डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले व रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्याचवेळी त्या ठिकाणा हुन माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे हे निघाले होते.

त्यांनी ही घटना पाहताच रुग्णवाहिकेला फोन केला व उपचारासाठी सुरवसे यांना पंढरपूर येथील कॉटेज हॉस्पिटलला रवाना केले. डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच भारत सुरवसे यांना मृत घोषित केले. या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा पवार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT