शेतकऱ्यांना आता आठ तासच वीजपुरवठा! Canva
सोलापूर

शेतकऱ्यांना आता 8 तासच वीजपुरवठा! वीजनिर्मितीवर परिणाम झाल्याचे कारण

शेतकऱ्यांना आता आठ तासच वीजपुरवठा! वीजनिर्मितीवर परिणाम झाल्याचे महावितरणचे कारण

संतोष सिरसट

महावितरणने शेतकऱ्यांना रात्री केल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्यामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर सोलापूर : महावितरणने (MSEDCL) शेतकऱ्यांना रात्री केल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्यामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी रात्री दहा तास तर दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र आता रात्री दहा ऐवजी आठ तासच वीजपुरवठा केला जाणार आहे. याला कोळसा टंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम झाला असल्याचे कारण महावितरणने दिले आहे.

महावितरणकडून शेतकऱ्यांना नियमितपणे दिवसा आठ तास तर रात्री दहा तास वीजपुरवठा केला जातो. त्यावर शेतकरी आपल्या पिकांना पाणी देण्याचे नियोजन करत असतात. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला वीज पुरवठ्याच्या वेळापत्रकामध्ये बदल केला जातो. त्यानुसार 1 ऑक्‍टोबरलाही वेळापत्रकामध्ये बदल केला होता. मात्र गुरुवारी (ता. 7) अचानक कोळसा टंचाईमुळे वीज निर्मितीवर परिणाम झाला असल्याचे कारण देत महावितरणने रात्रीच्या वेळेला आठ तास वीजपुरवठा करण्याचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना रात्रीही केवळ आठ तासच वीज मिळणार आहे.

राज्यभर सगळीकडे मुसळधार पाऊस पडत असताना शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात वाहून गेली आहेत. त्यातच महावितरणने वीजबिल वसुलीचा तगादा मोठ्या प्रमाणात लावला आहे. शेतकऱ्याच्या हाती काहीच पडलेले नसताना वीजबिल भरायचे कुठून, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. त्यातच आता महावितरणने रात्रीसाठी केवळ आठ तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांपुढे पुन्हा संकट उभे राहिले आहे. याबाबत महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही.

महाविकास आघाडीच्या काळात वसुली जोरात व वीजपुरवठ्यातही घट

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महावितरणने शेतकऱ्यांकडून वीजबिल वसुलीचा तगादा लावला आहे. आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे वीजबिल भरायचे कशाने, असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यातच आता महावितरणने वीजपुरवठाही दोन तासांनी कपात करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. शेतकऱ्यांना रात्रभर जागरण करावे लागणार आहे. रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत वीजपुरवठा चालू आठवड्यात केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT