Solapur News E-Sakal
सोलापूर

कांदा १४ रुपये किलो! महिन्यात २१ रुपयांनी गडगडले दर; केंद्राकडून निर्यात शुल्क कमी होईना; कांद्याचा दर कितीही असू द्या, व्यापाऱ्यांकडून २० दिवसांनंतरच पैसे

सोलापूर बाजार समितीत मागच्या महिन्यात साडेतीन हजार रुपयांचा असलेला कांद्याचा भाव आता १४०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. उत्पादन खर्च प्रतिकिलो १९ ते २२ रुपये येतो आणि सध्याचा कांद्याचा भाव प्रतिकिलो १४ रुपये आहे. शुक्रवारी सोलापूर बाजार समितीत ४२० गाड्या कांद्याची आवक होती.

तात्या लांडगे

सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागच्या महिन्यात साडेतीन हजार रुपयांचा असलेला कांद्याचा भाव आता १४०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. उत्पादन खर्च प्रतिकिलो १९ ते २२ रुपये येतो आणि सध्याचा कांद्याचा भाव प्रतिकिलो १४ रुपये आहे. शुक्रवारी (ता. १०) सोलापूर बाजार समितीत ४२० गाड्या कांद्याची आवक होती.

सोलापूर बाजार समितीत सोलापूरसह नगर, नाशिक, पुणे, लातूर, धाराशिव, सातारा व कर्नाटक (विजयपूर, कलबुर्गी) येथून कांदा विक्रीसाठी येत आहे. दरवर्षी मकर सक्रांतीनंतर कांद्याचे भाव कमी होतात, पण संक्रांत अजून काही दिवसांवर असतानाच कांद्याचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. १४ डिसेंबरमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी ३५०० रुपयांचा भाव होता, मात्र आता तो १४०० रुपये प्रतिक्विंटल झाला आहे.

कांदा लागवडीपासून काढून बाजार समितीत विक्री करण्यापर्यंत एकरी एक लाखांहून अधिक रुपयांचा खर्च होतो, ही वस्तुस्थिती आहे. पण, सध्याच्या दरानुसार एकरातील उत्पादित कांद्यातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच शिल्लक राहत नसल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कांद्याचे दर कमी झाल्याने व केंद्र सरकारने निर्यातीवर २० टक्के शुल्क आकारल्याने कांदा निर्यात थांबली आहे. त्याचाही परिणाम भाव कमी होण्यावर झाला असल्याचे बाजार समितीतील अधिकारी सांगत आहेत.

शुक्रवारची सोलापुरातील आवक

  • एकूण गाड्यांची आवक

  • ४२०

  • क्विंटलमध्ये आवक

  • ४२,०७६

  • सरासरी भाव

  • १४०० रुपये

  • एकूण उलाढाल

  • ५.८९ कोटी

कांद्याचा दर कितीही असू द्या, व्यापाऱ्यांकडून २० दिवसांनंतर पैसे

कांद्याचा दर सध्या खूपच कमी झाला असून अनेक शेतकऱ्यांना पदरमोड देखील करावी लागत असल्याचे चित्र आहे. बाजार समितीत शेतमाल विकल्यावर रोखीने बिल देणे अपेक्षित आहे. मात्र, पणन विभागाचे नियम पायदळी तुडवून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या मुदतीचा धनादेश दिला जातोय. त्यांना कितीही गरज असली तरीदेखील विकलेल्या कांद्याचे पैसे त्या मुदतीनंतरच मिळतात, अशी वस्तुस्थिती आहे. याकडे ना बाजार समितीच्या प्रशासकांचे ना जिल्हा उपनिबंधकांचे लक्ष, अशी सद्य:स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापरे! अर्जुननंतर अस्मितासमोर येणार सचिनच्या अफेअरचं सत्य; सासूबाईंसमोरच साक्षीला करतोय किस

महापालिका निवडणुकांआधी मोठा राजकीय बॉम्ब! ठाकरे बंधूंनंतर आता अजून एक भावांची जोडी एकत्र येणार? दलित मतांचे एकत्रीकरण होणार

Aquarius success astrology: कुंभ राशीवाल्यांनी 'या' तारखा नक्की लक्षात ठेवा! वर्षभर अपघात टळतील अन् यशाची दारं उघडतील

Sports Tournament in 2026: क्रिकेट ते फुटबॉल वर्ल्ड कप... २०२६ मध्ये क्रीडा स्पर्धांची सर्वात मोठी पर्वणी; 'या' तारखा नोट करून ठेवा

आता गणिताची कोडी सोडवणार अयोध्येचे 'राम मंदिर'; उत्तर प्रदेशातील इयत्ता चौथीच्या पुस्तकांमध्ये मोठे बदल

SCROLL FOR NEXT