logo 
सोलापूर

उंबरगावच्या कुसुमडे सासू-सुनांची सेंद्रीय शेतीत भरारी, डाळिंब, बोर, पेरू, केशर आंबा, नारळ, सुपारी, चिकू, सीताफळ, रामफळ, चिंचेचे उत्पादन 

प्रमोद बोडके

सोलापूर : कोरोनाच्या संकटामुळे पौष्टिक खाद्य आणि रोगप्रतिकारक शक्तीचे महत्त्व सर्वांनाच समजले आहे. मोठ्या शहरात राहणाऱ्या फ्लॅटमधील व्यक्तींपासून ते खेडेगावातील वाड्या-वस्त्यावरील व्यक्तींना आता सदृढ आरोग्याचे महत्त्व अधिक पटले आहे. शेतीतून अधिक उत्पादन मिळविण्याच्या हव्यासापोटी रासायनिक खतांचा बेसुमार वापर सुरु झाला. त्याचा विपरित परिणाम मानवी आरोग्यावर होऊ लागला. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे उंबरगाव (ता. पंढरपूर) येथील सौ. सुमन कुसुमडे व सौ. काजल कुसुमडे यांनी सेंद्रीय शेतीत भरारी घेतली आहे. 

कुसुमडे परिवाराकडे असलेल्या सहा एकर सोळा गुंठे जमिनीत त्यांनी डाळिंब, बोर, पेरू, केशर आंबा, नारळ, सुपारी, चिकू, सीताफळ, रामफळ, चिंच यासह इतर फळांचे सेंद्रीय पध्दतीने उत्पादन घेतले जाते. सेंद्रीय पद्धतीच्या शेतीतून उत्पन्नाचा नवीन मार्ग व कुटुंबासाठी आरोग्यदायी अन्न त्यांनी तयार केले आहे. कुसुमडे सासू, सुना शेतीसोबतच खिलार गायींचे संगोपन, शेळीपालन व देशी कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत. शेतीसाठी लागणारे शेणखत, लेंडीखत हे त्यांच्याकडे तयार होते. याशिवाय गांडूळ खताच्या माध्यमातूनही शेतीला सेंद्रीय खते दिली जातात. 

सौ. सुमन कुसुमडे व सौ. काजल कुसुमडे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. तरी देखील बदलत्या काळानुसार या सासू, सुनांनी शेतीत केलेला बदल हा कौतुकास्पद आहे. सौ. सुमन कुसुमडे या गेल्या वीस वर्षांपासून कुसुमडे परिवारातील शेतीची संपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत. सौ. सुमन कुसुमडे यांचे पती शामराव कुसुमडे हे माजी सैनिक आहेत. सेंद्रीय शेतीसाठी त्यांची प्रेरणा मोलाची ठरली. काजल यांच्यासोबतच जयश्री आणि पूजा या सुनांचादेखील सौ. सुमन कुसुमडे यांना हातभार लागत आहे. 2011 मध्ये विवाह करून त्यांच्या कुटुंबात आलेल्या काजल यांची मोठी साथ सौ. सुमन कुसुमडे यांना मिळत आहे. या सासू, सुनांनी सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून वेगळा प्रयोग उंबरगावसारख्या ग्रामीण भागात यशस्वी करून दाखवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

'एक दिवाने की दिवानियत' चित्रपटाच्या डबिंगदरम्यान रडला हर्षवर्धन राणे

Athletics Championships: नीरज-अर्शदकडून निराशा, पण भारताच्या सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं; जाणून कोण ठरलं विजेता

Latest Maharashtra News Updates : तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन संजय शिरसाठ यांची हकालपट्टी करा, तृतीयपंथी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT