Seena 
सोलापूर

तरटगाव येथील सीना नदीवरील बंधाऱ्याची दारे रात्रीतून काढली ! खालच्या बंधाऱ्यांना धोका 

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : सीना नदीवरील करमाळा तालुक्‍यातील तरटगाव बंधाऱ्याची शनिवारी (ता. 22) मध्यरात्री अनोळखी व्यक्तीने दारे काढली आहेत. त्यामुळे बंधारा रिकामा होण्याची शक्‍यता निर्माण झाली असून, जास्त पाणी गेल्यास खालचा बंधारा फुटण्याचाही धोका निर्माण झाला आहे. येथे त्वरित सुरक्षारक्षक देऊन बंधाऱ्याचे दार बसवावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

तरटगाव बंधारा भरल्यास सोलापूर व नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होतो. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने सीना नदी जुलैपासूनच पाण्याने वाहत आहे. सरकारच्या नियमानुसार बंधाऱ्याची दारेही टाकली होती. सध्या बंधाऱ्यामध्ये आठ दारे भरली आहेत. नववे दारही टाकले होते. त्यामुळे नदीच्या बाजूला असलेल्या शेतीत पाणी जाते. बंधारा पूर्ण क्षमतेने भरला तर उन्हाळ्यातही पाणी राहते. मात्र, शनिवारी रात्री बंधाऱ्याची नवव्या दारातील पाच दारे अनोळखी व्यक्तीने काढली आहेत. त्यामुळे बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी खाली जात आहे. 

सकाळी काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काही दारे पुन्हा टाकली आहेत, असे तरटगावचे सरपंच डॉ. अमोल घाडगे यांनी सांगितले. मात्र, एक दरवाजा बसवायचा राहिलेला आहे. दारे कोणी काढली, याची त्वरित चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

सीना नदीवर दिघी, खडकी, तरटगाव, पोटेगाव व संगोबा येथे कोल्हापुरी पद्धतीने लघु पाटबंधारे आहेत. यातील पोटेगावचा बंधारा फक्त नावाला आहे. संगोबाच्या बंधाऱ्याचे पाणी तरटगावच्या बंधाऱ्यापर्यंत आले आहे. या बंधाऱ्यातून व तरटगावच्या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. याकडे पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत आहे. बंधाऱ्याची गळती वेळीच काढली नाही तर लवकरच बंधारे रिकामे होतील. 

याविषयी शशिकांत नरुटे म्हणाले, यावर्षी बंधाऱ्यात चांगले पाणी आहे. मात्र, पाटबंधारे विभाग सहकार्य करत नाही. नियमानुसार बंधाऱ्याची दारेही टाकली नसल्याने मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. सध्या वरून पाणी वाहत आहे. त्यांना पाटबंधारे विभागाने सहकार्य करण्याची गरज आहे. 

गुन्हा दाखल करणार 
पाटबंधारे विभागाचे अधिकारी श्री. इंगळे म्हणाले, तरटगाव बंधाऱ्याचे दार कोणी काढले हे माहीत नाही. याबाबत अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करणार आहोत. मनुष्यबळ कमी आहे. बंधाऱ्याला नऊ दारे टाकून दिली आहेत. वरून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने गळती काढता येत नाही. पाणी कमी झाल्याबरोबर गळती काढण्यात येईल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT