शालेय पोषण आहार
शालेय पोषण आहार esakal
सोलापूर

पोषण आहाराविना साडेतीन लाख विद्यार्थी। सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत मुले उपाशीच

तात्या लांडगे

सोलापूर : पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांना दुपारच्यावेळी शालेय पोषण आहार शिजवून दिला जातो. कोरोना काळात शाळा बंद राहिल्याने या मुलांना तांदूळ व अन्य धान्य घरपोच देण्यात आले. आता फेब्रुवारीपासून शाळा सुरू असून पूर्ण क्षमतेने शाळा सुरू झाल्या. पण, त्यांना पोषण आहार शिजवून द्यायला तांदूळ नसल्याने जिल्ह्यातील चार हजार ८५ शाळांपैकी तीन हजार ६०० शाळांमधील मुलांना पोषण आहार मिळत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्र बाहेर आल्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. पण, शाळेची वेळ सुरवातीला सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आली होती. कडक उन्हामुळे पुन्हा शाळेची वेळ बदलण्यात आली. शाळा सुरू होऊन उन्हाळा सुट्टी लागायला ४३ दिवस शिल्लक असल्याने शासनाकडून वितरीत केलेल्या अन्नधान्याचे पैसे मिळतील की नाही, याची शाश्वती बचतगटांना नव्हती. त्यामुळे शहरातील शाळांमधील सर्वच मुलांना शालेय पोषण आहार मिळालाच नाही. घरापासून दूर अंतरावर शाळा आणि माध्यान्ह सुट्टी केवळ ३० मिनिटांचीच असल्याने त्यांना घरी जाऊन जेवण करून येणे अशक्य आहे. त्यामुळे बहुतेक मुले उपाशीपोटीच शाळेत बसत आहेत. सकाठी सात वाजता घर सोडल्यानंतर ते दुपारी साडेबारा वाजताच घरी जात आहेत. कोरोना काळातील १५४ दिवसांचे तांदूळ मुलांना घरपोच दिल्यानंतर आता शाळांकडे तांदूळच शिल्लक नसल्याची स्थिती समोर आली आहे. पुरवठादारांकडूनही वेळेत धान्य न मिळाल्याने तूर्तास शालेय पोषण आहाराविनाच मुले उपाशीपोटी शाळेत शिक्षण घेत आहेत. तर काही शाळा रेशन धान्य दुकानातून तांदूळ विकत घेऊन पोषण आहार देत आहेत. पण, वास्तविक पाहता रेशनचा तांदूळ चांगल्या प्रतीचा नसल्याने त्या पोषण आहाराची गुणवत्ता काय, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. पहिली ते पाचवीतील प्रत्येक मुलास १०० ग्रॅम तर सहावी ते आठवीतील मुलाला प्रत्येकी १५० ग्रॅम तांदूळ शिजवून दिला जातो. त्याच्यासोबत दररोज एक भाजी दिली जाते. पोषण आहार शाळेत मिळत नसल्याने हातावरील पोट असलेल्या मुलांची पंचाइत झाली आहे. तरीही, त्याकडे ना मुख्याध्यापक ना शिक्षकांचे लक्ष असा पालकांचा आरोप आहे.

नाचणीची बिस्किटे एक महिन्यासाठीच...
कोरोना काळातील एका महिन्यात मुलांना नाचणी, बाजरी, ज्वारीची बिस्किटे देण्याचा निर्णय शासन स्तरावरून झाला. एका मुलाला सहा पुडे देण्यात आले होते. पण, एका महिन्यानंतर बिस्किटे देणे बंद झाले. बिस्किटे देण्याचे का बंद झाले, त्याचे काहीही कारण शालेय शिक्षण विभागाने दिले नाही, हे विशेष. तर एक महिन्यासाठीच का बिस्किटे दिली, याचेही उत्तर कोणीच दिले नाही.

शाळा सुरू झाल्यानंतर १ एप्रिलपासून मुलांना पोषण आहार शिजवून देण्यासंदर्भात मुख्याध्यापकांना आदेश दिले आहेत. तसेच पुरवठादारांनाही तांदूळ वेळेत पोच करण्याची नोटीस काढली आहे. शाळांमधील तांदूळ संपल्याने पोषण आहार शिजवून देणे सुरू झालेले नाही.
- किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

पोषण आहाराची स्थिती
एकूण शाळा
४,०८५
शालेय पोषणाचे विद्यार्थी
४,७०,९७०
आजार शिजवणाऱ्या शाळा
३९८
पोषण आहाराविना अंदाजित विद्यार्थी
३.४९ लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

AIMIM Chief Asaduddin Owaisi: 'मुस्लिम सर्वात जास्त वापरतात कंडोम....', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

Ban vs Ind 1st T20 : भारताची विजयाने सुरुवात! मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती; टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

Alien Life : पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत

SCROLL FOR NEXT