कोल्हापूर - साखर कारखान्यात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे उत्प्रेरकाच्या मदतीने व सूर्यप्रकाशाद्वारे होणारे विघटन. 
पश्चिम महाराष्ट्र

साखर कारखान्यातील सांडपाणी ९० टक्के शुद्ध करण्यात यश

अमृता जोशी

अजित पवारचे संशोधन - प्रयोगाला लीला परशुराम आगाशे विज्ञान संशोधन पुरस्कार

कोल्हापूर - मराठी विज्ञान परिषदेतर्फे झालेल्या विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धेत येथील अजित राजेंद्र पवार याने राज्यस्तरावर पहिले पारितोषिक मिळविले. त्याच्या ‘साखर कारखान्यात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे उत्प्रेरकाच्या मदतीने सूर्यप्रकाशाद्वारे विघटन’ या प्रयोगाला ‘लीला परशुराम आगाशे विज्ञान संशोधन पुरस्कार - २०१६’ मिळाला. 

पुणे येथील आयसर (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च) संस्थेतील संशोधक प्रा. मिलिंद वाटवे यांच्या हस्ते त्याला गौरविले. साखर कारखान्यातून बाहेर पडणारे दूषित सांडपाणी तसेच, टेक्‍स्टाईल इंडस्ट्रीमधील सांडपाणी (यात कापडासाठी वापरले जाणारे डाय असते) यावर प्रक्रिया करण्याचे सोपे तंत्र शोधून काढले आहे. यासाठी टिटॅनियम डायऑक्‍साइड (TiO२) चा उत्प्रेरक (रासायनिक प्रक्रियेला चालना देणारा घटक) म्हणून वापर केला आहे. टिटॅनियम डायऑक्‍साइड पर्यावरणपूरक असून, त्याची रासायनिकदृष्ट्या स्थिरता (स्टॅबिलिटी) जास्त आहे. याचा वापर करून सूर्यप्रकाशाद्वारे कारखान्यातील दूषित सांडपाण्याचे रासायनिक विघटन घडवून आणले. या प्रयोगातून सांडपाण्याचे ९० टक्के शुद्धीकरण करण्यात यश मिळाले आहे. अजित सध्या शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी विभागात बीएस्सीच्या तृतीय वर्षात शिकत आहे.

सध्या साखर कारखाना किंवा टेक्‍स्टाईल इंडस्ट्रीमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेसाठी ॲक्‍टिव्हेटेड स्लज प्रोसेस, यू. व्ही. डिसइन्फेक्‍शन, फिल्टरेशन, सेडिमेंटेशन, लाइम ॲडिशन, एअरेशन टॅंक आदी यंत्रणा, तंत्रज्ञान वापरले जाते. या प्रोसेसिंग युनिटचा खर्च कोटींमध्ये आहे. इतक्‍या खर्चानंतरही या सांडपाण्याचा दूषितपणा कमी होऊन ते पिण्यायोग्य बनत नाही. या पार्श्‍वभूमीवर अजित पवारने विकसित केलेल्या तंत्राला महत्त्व आले आहे.

साखर कारखान्यातील, टेक्‍स्टाइल इंडस्ट्रीतून बाहेर पडणाऱ्या दूषित सांडपाण्याचे राज्य शासनाच्या वॉटर टेस्टिंग लॅबमध्ये परीक्षण करून घेतले. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात प्रक्रियेनंतरही दूषित घटक बऱ्याच प्रमाणात राहतात. टिटॅनियम डायऑक्‍साइडची ०.३ ग्रॅम पावडर ३०० मिली दूषित पाण्यासाठी वापरली. सांडपाण्याचा उग्र वास, दूषितपणा ९० टक्के कमी झाला. तरीही हे पाणी पिण्यायोग्य नाही. अधिक प्रयोगांतून ते पिण्यायोग्य बनविता येईल. 
- अजित पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेची शिवसेना कोल्हापुरात स्वबळावर लढणार का? कार्यकर्त्या बैठकीत काय झाला निर्णय

Women's World Cup : हर्लीन देओलचा प्रश्न अन् लाजले पंतप्रधान नरेंद्र मोदी; वर्ल्ड कप विजेत्या पोरींना आवरेना हसू Video Viral

Vayuputhra : हे आहे 'वायुपुत्र'! भारताचं पहिलं इलेक्ट्रिक रॉकेट; कितीहीवेळा करा चार्जिंग, लवकरच स्पेसमध्ये जाणारा हा चमत्कार एकदा बघाच

Pune Car Accident : पुण्यात आणखी एक भीषण अपघात ! पौड रस्त्यावर मेट्रो पिलरला कार धडकली अन्...

Rahul Gandhi: ‘मतचोरी’चा बॉम्ब फोडणाऱ्या काँग्रेस उमेदवाराचीच डबल नोंदणी! पुरावा पाहा...

SCROLL FOR NEXT