टेंभू योजनेसाठी कृष्णा नदीत बराज बांधून पाणी अडवले आहे. याच पाण्याने दुष्काळी कडेगाव तालुक्‍याचे अर्थकारण बदलले.
टेंभू योजनेसाठी कृष्णा नदीत बराज बांधून पाणी अडवले आहे. याच पाण्याने दुष्काळी कडेगाव तालुक्‍याचे अर्थकारण बदलले. 
पश्चिम महाराष्ट्र

टेंभू, ताकारीच्या पाण्याने हरित-धवल क्रांती

संतोष कणसे

कडेगाव - कडेगाव तालुक्‍याची दुष्काळी अशी ओळख होती. ताकारी, टेंभूसह सहकारी-खासगी योजनांच्या माध्यमातून येथे मोठी आर्थिक क्रांती झाली. राजकीय स्पर्धाही अर्थकारण बदलण्यास कारणीभूत ठरली. या योजनांच्या पाण्यामुळे जमिनी ओलिताखाली आल्या. दुष्काळी तालुका ही ओळख पुसली गेली. तालुका सधन वर्गवारीत गणला जात आहे. 

दुष्काळी तालुक्‍यापैकीच एक कडेगाव तालुका होता. तालुक्‍याला मोठी राजकीय परंपरा असल्याने नेतृत्वाने ताकद पणाला लावून ताकारी व टेंभू या योजनांना निधी खेचून आणला. ताकारी व टेंभू योजनांच्या तोंडाला तालुका आहे. योजना सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा पाणी तालुक्‍यात आले. नेत्यांनी सिंचन योजनांची उर्वरित व पोटकालव्यांची कामे करून घेतली. त्यामुळे योजनांचे पाणी आल्यानंतर बघत बघता पोटकालव्याच्या माध्यमातून पाणी थेट शिवारात आले. येथे हरित क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली.

सिंचन योजनांसह अर्थकारण बदलण्यास राजकीय स्पर्धाही कारणीभूत ठरली. राजकीय स्पर्धेतून दोन साखर कारखाने, सूतगिरण्या, दूधसंघासह विविध संस्थांची उभारणी झाली. नेत्यांनी ताकारी, टेंभूचे पाणी येणार म्हणून योजना पूर्ण होण्यापूर्वीच कारखाने स्थापन केले. पाणी आल्यानंतर मात्र जमीनी ओलिताखाली आल्या. मात्र ऊसासह इतर बागायती पिकांचेही क्षेत्र वाढले. नंतर अर्थकारण खऱ्या अर्थाने बदलू लागले.

सध्या ताकारी, टेंभूच्या माध्यमातून अंदाजे १३ हजार पेक्षा जास्त हेक्‍टर जमिन ओलिताखाली आली. ऊसाचे क्षेत्र मोठे आहे. द्राक्षे, डाळींब, हळद, आले, केळी, सोयाबीन, भाजीपाला आदि नगदी पिकेही मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत. 

सहकारी संस्था (आकडेवारी)
साखर कारखाने.................२
सुतगिरणी........................३
विकास सोसायट्या............६४
दुध संघ..........................२
पतसंस्था........................३२

सिंचन योजना व क्षेत्र (हेक्‍टर) 
ताकारी...................७३०० (अंदाजे)
टेंभू.......................६००० (अंदाजे)

दुधामुळे ताजा पैसा
दोन दूध संघ आहेत. शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायही वाढला आहे. या व्यवसायातून ताजा पैसा मिळत आहे. सोसायटी, पतसंस्था, शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग, सुतगिरणी आदी उद्योगांसह औद्योगिक वसाहतींमुळे मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी निर्माण झाल्यात. अशा रीतीने तालुक्‍यात आर्थिकदृष्ट्या प्रगतीची पावले उमटू लागली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू चहरला झाली गंभीर दुखापत, सामन्यानंतर कोचने केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT