paan mandir 
पश्चिम महाराष्ट्र

त्या दोघी बनवतात पानाचा विडा, 400 प्रकारचा, पण कलकत्ता पानच येईना ! 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः त्या दोघी पानपट्टी चालवतात... तब्बल चारशे प्रकारचे विडे बनवतात... पानपट्टीचे नाव ठेवलेय, पान मंदीर... पण, कोरोना संकट काळात त्यांच्या व्यवसायावरही मोठे संकट आले आहे. त्यांना विडा बनवण्यासाठी लागते कलकत्ता पान. ते आता बंदच आहे. तोवर विडा बनवायचा कसा, हा त्यांच्यासमोर प्रश्‍न आहे.

पानपट्ट्या सुरु झाल्या, तेथे मावा विकला जातो... आम्ही तसला प्रकार करत नाही, आम्ही फक्त स्वीट पान विकतो आणि त्याला फक्त कलकत्ता पान लागते. ते येईपर्यंत "विडा बंदी' असेल, असे अनिता आवटी आणि सरस्वती आवटी या सख्या जाऊबाई हताशपणे सांगतात. 


अनिता आणि सरस्वती यांनी अतिशय धाडसाने एक प्रयोग केला. या दोघी मूळ शिक्षिका, मात्र त्यांनी पानपट्टीचा व्यवसाय सुरु करायचा ठरवला. सांगलीत आपटा पोलिस चौकीजवळ पान मंदिर नावाने पानपट्टी सुरु केली. तेथे फक्त स्विट पान त्या विकतात. तंबाखूयुक्त पानाला त्यांच्याकडे मज्जाव आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल चारशे प्रकारचे पान त्या बनवतात. इतकी प्रचंड व्हरायची असणारे बहुदा सांगलीतील हे एकमेव पान सेंटर असावे, त्यात महिला संचालक असल्याने महिला ग्राहकांची संख्या लक्षणिय. घरातील समारंभासाठी ऑर्डर देऊन हजार हजार पान मागवणारे अनेक ग्राहक आहेत. अगदी काही लोक तर एकावेळी आठ-दहा पान खाऊनच पुढे जातात, इतकी लज्जत त्यात असते. 


या व्यवसायावर कोरोनाचे संकट आहे. दोन महिने पान मंदिर पूर्णपणे बंद होते. पानाचा व्यवसाय म्हणजे पान खावून लोक पिचकारी मारणार हे ठरलेले आहे. त्यामुळे पानपट्टी सुरु करण्यास लवकर मान्यता मिळाली नाही. ती आता मिळाली आहे, मात्र पान मंदिरची वेगळीच अडचण झाली आहे. तेथे कलकत्ता पानातच विडा बनतो. अगदी साधा पान आणि गोविंद विडा वगळता सर्व विड्यांसाठी मोठ्या आकाराचे, जाडसर कलकत्ता पानच लागते. ते पश्‍चिम बंगालमधून येते. दोन महिने वाहतूक ठप्प आहे. 


त्यामुळे आता पानपट्ट्या सुरु झाल्या असल्या तरी अनिता आणि सरस्वती हतबल आहेत. पान बनवायचे कस? हा प्रश्‍न आहे. नियमित ग्राहकांना पान मंदिर सुरु झाल्याने आनंद झालाय, ते चौकशीही करत आहेत, मात्र त्यांना हवे ते पान बनवता येत नसल्याची नाराजी अनिता यांनी व्यक्त केली. पश्‍चिम बंगालमध्ये सरकार आणि तेथील पान उत्पादक शेतकऱ्यांचा सध्या संवाद सुरु आहे. पानांची वाहतूक व्हावी, यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना साकडे घातले गेले आहे. चौथा लॉकडाऊन संपताच हे सारे सुरळित होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर मग पुन्हा विडा रंगेल आणि पान मंदिर पुन्हा बहरेल, अशी आशा आहे. तोवर पान शौकिनांना थोडी प्रतिक्षा करावीच लागेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT