three years boy dead in sangli jat for accident of burn in water  
पश्चिम महाराष्ट्र

झोपेतच सिद्धूच्या अंगावर पडले गरम पाणी अन् कुटुंबाने फोडला हंबरडा

सकाळ वृत्तसेवा

जत (सांगली) : साळमळगेवाडी (ता. जत) येथे गरम पाणी अंगावर पडून एका तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला, तर वडील भाजून जखमी झाले. सिद्धू (वय ३ वर्षे) असे मृत मुलाचे नाव असून परशुराम गुराप्पा सखरे (वय ३०, रा. साळमळगेवाडी, ता. जत) असे जखमीचे नाव आहे. उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्‍टरांनी सिद्धूला मृत घोषित केले.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की सखरे कुटुंब बिळूर व साळमळगेवाडी सीमेवर छोट्याशा पत्र्याच्या घरात राहायला आहेत. घरी परशुराम, त्यांची पत्नी, आई - वडील व तीन वर्षांचा सिद्धू, असे राहतात. द्राक्ष बागेवर कामाला गेल्याशिवाय कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही. 

सकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास अंघोळीसाठी पाणी 
तापविण्यासाठी ठेवलेल्या भांड्याला धक्का लागला व गरम पाणी झोपेत असणाऱ्या सिद्धूच्या अंगावर पडले. तर त्याला वाचविण्यासाठी गेलेले वडील परशुराम हे देखील जखमी झाले. या घटनेनंतर परशुराम यांनी मुलाला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्‍टरांनी सिद्धूचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मात्र, याची नोंद उशिरापर्यंत जत पोलिस ठाण्यात झाली नव्हती.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

३०० वर्षानंतर मानवी शरीरात आढळला नवा अवयव, कॅन्सर उपचारात होऊ शकतो बदल

Weather Update : कोल्हापुरात ढगफुटीसदृश पाऊस, अनेक भागात ‘कोसळधार’; आणखी 'किती' दिवस पावसाची शक्यता!

BDCC Bank : बीडीसीसी बँकेसमोर काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी; सचिवाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा BJP चा आरोप

Latest Marathi News Updates : ऑगस्ट महिन्याच्या देशी, विदेशी दारूच्याविक्रीत घट

India vs Pakistan Asia Cup 2025 : सरकारच्या आदेशानुसार भारत-पाकिस्तान सामना, नियमांचं पालन करणार; अरुण धुमल यांचं स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT