Udyanraje Bhosale 
पश्चिम महाराष्ट्र

राजकारण हा माझा पिंड नाही : उदयनराजे 

सकाळ वृत्तसेवा

सातारा : नागरिकांची कामे मार्गी लागण्यासाठी मी प्रय़त्न करत आहे. राजकारण हा माझा पिंड नाही. नागरिकांचे मुद्दे घेऊन मी आतापर्यंत राजकारण केले आहे, असे सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे भोसले आज (मंगळवार) सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अर्ज दाखल करत आहेत. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांनी कामांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

उदयनराजे म्हणाले, की निवडणुका केंद्रातील असो की राज्यातील त्या अटळ असतात. त्या निवडणुकीला सामोरे जात असताना द्विधामनस्थिती आता दूर झाली आहे. नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज मी अर्ज भरत आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा मी प्रयत्न करेन. मला कोणत्या पदाची अपेक्षा नव्हती. पण, माझ्या मतदारसंघात अनेक वर्षांपासून जे प्रश्न होते ते सोडवायचे होते. कृष्णा खोऱ्यातील नागरिकांची कामे मार्गी लागलेली नाहीत. राजकारण हा माझा पिंडच नाही. मुद्दे घेऊन मी राजकारण केले आहे. लोकांच्या कामांना प्राधान्य देणे हेच मी करतो. मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाबाबचे प्रश्न भाजप सरकारने मार्गी लावले आहेत. मनावर दडपण होते, ते आता नाही. गेल्या 13 वर्षांत अनेक कामे रखडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, उमेदवारही केला जाहीर; उद्या अर्ज भरणार

Mumbai News: ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा! पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार

आखाती युद्धाचा कांद्याला मोठा फटका; निर्यात ४५ टक्के घसरली, दर कोसळल्याने शेतकरी संकटात

Mumbai Weather Update : मुंबईसाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे, कसं असेल तापमान? हवामान विभागाने दिली माहिती

म्हाडा ३० हजार घरे उभारणार, राज्य सरकारकडे १०० एकर जागेसाठी पाठपुरावा सुरू

SCROLL FOR NEXT