Ujani Dam Water
Ujani Dam Water 
पश्चिम महाराष्ट्र

'उजनी'काठच्या कुटुंबांचा सर्व्हे

सकाळवृत्तसेवा

सोलापूर - उजनी धरणातील पाणी नागरिकांच्या आरोग्याबरोबरच शेतीसाठीदेखील अयोग्य असल्याचा निष्कर्ष सोलापूर विद्यापीठाच्या संशोधनाच्या पहिल्या टप्प्यात निघाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे विद्यार्थी धरणाच्या काठावरील काही कुटुंबांचा सर्व्हे करणार आहेत. त्यामध्ये सोलापूरसह पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील काही गावे निवडली आहेत.

उजनी धरणात रसायनमिश्रित पाणी असून, ते दूषित पाणी पिल्याने नागरिकांमध्ये पोटाचे विकार वाढत असून, शेतीच्या उत्पन्नातही घट होत आहे. धरणातील पाण्याचा रंगही सध्या हिरवा झाला असून, ते पाणी भाजीपाल्यासह फळबागांसाठी घातक असल्याचे मत विद्यापीठाकडून नोंदविण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यात सोलापूर विद्यापीठाने धरणातील नऊ ठिकाणचे पाण्याचे नमुने लॅबमध्ये तपासले होते. आता डिसेंबरअखेरीस त्याच ठिकाणच्या पाण्याचे नमुने पुन्हा तपासले जाणार असून, त्यानंतर उन्हाळ्यातही त्याची पडताळणी केली जाणार आहे.

तिन्ही हंगामात धरणातील पाण्यात कसा बदल होतो, त्याचे मानवी जीवनावर व शेतीवर काय परिणाम होतो, याविषयी विद्यापीठ संशोधन करीत आहे. त्यासाठी विद्यापीठाने 3 लाख 84 हजारांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती या संशोधनाचे प्रमुख प्रा. डॉ. गौतम कांबळे यांनी सांगितले.

संशोधनाचा दुसरा टप्पा
उजनी धरणामुळे बाधित झालेल्या 51 गावांपैकी सोलापूर व पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी दोन गावे आणि अहमदनगर जिल्ह्यातील एक गाव या संशोधनासाठी विद्यापीठाने निवडली आहेत. तसेच या गावांमधील 47 हजार कुटुंबापैकी 470 गावांचा सर्व्हेही डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर एप्रिल-मे महिन्यात पुन्हा त्याच ठिकाणचा सर्व्हे करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. डॉ. गौतम कांबळे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : अमेठीतून राहुल गांधी उद्या भरणार अर्ज? सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT