EXAM
EXAM 
पश्चिम महाराष्ट्र

विद्यापीठांना डोहाळे महिन्याभरात परिक्षा उरकण्याचे!

तात्या लांडगे

सोलापूर : विद्यापीठाच्या ऑनलाइन प्रवेशाच्या हट्टामुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाला तब्बल महिन्याचा विलंब झाला. महाविद्यालये सुरु होऊन वीस दिवस झाले असतानाच आता एका महिन्यातच परीक्षा आयोजित करण्याचे काम विद्यापीठाकडून सुरु आहे. मात्र, ऑक्‍टोबरमध्ये विधानसभा निवडणूक तर नोव्हेंबरमध्ये विद्यार्थी परिषदेची निवडणूक या कारणांमुळे विद्यापीठाने 19 सप्टेंबरपासून परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. तरीही युवा महोत्सव याच कालावधीत घेतला जाणार असल्याने अद्याप परीक्षेचे वेळापत्रक अध्यंतरीच असल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्‍त केला आहे. 

पुणे, कोल्हापूर, मुंबई विद्यापीठांच्या तुलनेत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रवेश यंदा 14 ऑगस्टपर्यंत सुरु होते. विद्यार्थी- प्राध्यापकांची ओळख नुकतीच झाली आणि आता अभ्यासक्रम शिकवायला सुरवात केली, तोवर परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना नापास होण्याची भिती वाटू लागली आहे. दरम्यान, सोलापूर विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर अपेक्षित नोकरी मिळत नाही, या समजुतीतून दरवर्षी सोलापुरातील दीड हजार विद्यार्थी स्थलांतर करीत असल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाकडून ठोस प्रयत्नाची अपेक्षा पालकांना असतानाही विद्यापीठाचा गलथान कारभार अद्याप सुरुच आहे. विद्यापीठात नवनवे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले तरीही काही अभ्यासक्रमांना विद्यार्थीच मिळत नसल्याचे वास्तव आहे.

दरम्यान, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा घोळ कायम असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. पैसे घेऊन नापास विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे, वेळेवर निकाल लागत नाही, कॅम्पस्‌ सिलेक्‍शन होत नाही, सोयी-सुविधांच्या अभावामुळे सोलापूरकर विद्यार्थी पुणेकर होत असल्याचेही चित्र पहायला मिळत आहे. तरीही विद्यापीठाकडून काहीच ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. 

"युवा महोत्सव सप्टेंबरमध्ये होणार असल्याचे खरे आहे. परंतु, सत्र लांबणीवर पडल्याचा परिणाम निकालावर होतो. त्यातच पुन्हा विधानसभा निवडणूक आणि विद्यार्थी परिषदेच्या निवडणूका असल्याने परीक्षा 19 सप्टेंबरपासून सुरु करण्याचे वेळापत्रक केले आहे. मात्र, ते अद्याप अंतिम झालेले नाही."
- डॉ. श्रीकांत कोकरे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ 


विद्यापीठात नियमित तासच होत नाहीत 
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी विद्यापीठाचे नाव जागतिक स्तरावर नेऊ अशा गप्पा मारणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात विद्यापीठातील सामाजिकशास्त्र संकुलासह अन्य काही विभागातील अभ्यासक्रमांचे तास नियमित होत नसल्याचे चित्र आहे. दररोज उपस्थित राहणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना नोटस्‌ काढण्यासाठी प्राध्यापक पुस्तके देतात आणि प्रात्यक्षिकावेळीही साहित्य अथवा मनुष्यबळ पुरेसे नसल्याचे सांगून घरुन प्रात्यक्षिक करुन आणा, असा सल्लाही दिला जातोय, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. दरम्यान, विद्यार्थी नियमित उपस्थित राहत नसल्याने तास होत नसल्याचे उत्तर प्राध्यापक देऊ लागले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT