महाबळेश्‍वर - गहू गेरवा संशोधन केंद्रातील गव्हाचे सर्व वाण थंडीमुळे नष्ट झाल्याने या वर्षी संशोधन ठप्प झाले आहे.
महाबळेश्‍वर - गहू गेरवा संशोधन केंद्रातील गव्हाचे सर्व वाण थंडीमुळे नष्ट झाल्याने या वर्षी संशोधन ठप्प झाले आहे. 
पश्चिम महाराष्ट्र

थंडीच्या हल्ल्यात गव्हाचे २७५८ वाण नष्ट

सकाळवृत्तसेवा

महाबळेश्वर - येथील वेण्णा तलाव परिसरात असलेल्या राहुरी कृषी विद्यापीठ संचलित गहू गेरवा संशोधन केंद्रात गहू संशोधनासाठी वाढविलेली सुमारे दोन हजार २७५८ वाणाची रोपे थंडीच्या हल्ल्यामुळे जळून नष्ट झाली. त्यामुळे गव्हावरील तांबेरा रोगावरील संशोधन, निरीक्षण व त्याच्या अनुमानासाठी सुमारे वर्षभर थांबावे लागणार आहे.

गव्हावरील तांबेरा रोगावर संशोधन करण्यासाठी गहू गेरवा संशोधन केंद्र १९४१ मध्ये सुरू करण्यात आले. येथे विविध जातीच्या गव्हाची रोपे लावून ती वाढविली जातात. गव्हावरील तांबेरा रोगासंदर्भातील सर्व प्रकारचे संशोधन या केंद्रामधून केले जाते. भारतात हे एकमेव गहू गेरवा संशोधन केंद्र असून, या केंद्रातून चाचणी झालेले तांबेरा रोगास प्रतिकारक्षम असलेली जात (वाण) देशातील शेतकऱ्यांना लागवडीसाठी शिफारस केली जाते. सुमारे २७७९ प्रकारचे गव्हाचे वाण (गव्हाच्या जातीची रोपे) प्रतिवर्षी या केंद्रातील शेतात लावली जातात. ती वाढवून त्याचे निरीक्षण केले जाते. वेगवेगळ्या हंगामात त्यावर येथील वातावरणाचा काय परिणाम होतो, याचे निरीक्षण करून त्याची रोजच्या रोज नोंद केली जाते. येथील थंड हवा गव्हावरील तांबेरा रोगासाठी अतिशय पोषक असल्याने लागवड केलेल्या विविध प्रकारच्या गव्हाच्या जातींवर याचा काय, कसा व किती प्रमाणात परिणाम होतो, याचे अचूक निरीक्षण, त्यावर संशोधन या केंद्रातील तज्ज्ञ शास्त्रज्ञांकडून केले जाते. तसेच तांबेरा रोगास प्रतिकारक्षम असलेली जात (वाण) देशातील शेतकऱ्यांना लागवडीसाठी शिफारस केली जाते. एवढे महत्त्वपूर्ण संशोधन येथे केले जाते. 

यावर्षी ही अशाच विविध प्रकारच्या सुमारे २७७९ जाती या संशोधन केंद्राने लावल्या होत्या. गेल्या आठ महिन्यांपासून त्याचे संगोपन करून त्या उत्तम प्रकारे वाढविल्या होत्या. सध्या या संपूर्ण क्षेत्रात गव्हाची रोपे पूर्णपणे वाढली होती तसेच सध्याच्या रब्बी हंगामातील येथील थंडीमुळे गव्हावरील तांबेरा रोगास वातावरण अनुकूल होते व त्याच्या निरीक्षणाची तयारी शास्त्रज्ञांनी केली असतानाच आठ व नऊ फेब्रुवारी रोजी अचानक या भागातील गारठा वाढला. थंडीचा कडका एवढा वाढला की, त्याने या वर्षीच्या हंगामातील निचांकी थंडीचा उच्चांक केला. वेण्णा तलाव ते लिंगमळा परिसरातील निचांकी तापमान ० ते उणे दोनपर्यंत खाली गेले होते. गहू गेरवा केंद्रात तर त्यांच्या तापमापकाने उणे चार पर्यंतची नोंद झाल्याचे सांगितले. हिमकणही मोठ्या प्रमाणात तयार झाले होते. त्यामुळे परिसरातील फळे, पालेभाज्या, फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची रोपे जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांवर आपत्ती ओढवली होती. यापेक्षा काही वेगळे चित्र या संशोधन केंद्रामधील गव्हाच्या रोपांचे नव्हते. सुमारे दोन एकराचा गव्हाचा प्लॉट जळून तो संशोधनालायक राहिला नाही. पूर्ण वाढ झाल्याने नुकतीच  या रोपांच्या ओंब्यामध्ये गव्हाचे दाणे तयार होत असताना अचानकच्या कडाक्‍याच्या थंडीमुळे सर्वच्या सर्व रोपे जळून आतील दाणे नष्ट झाल्याने आता ही रोपे कुचकामी झाली आहेत, असे गहू गेरवा संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ टी. के. नरुटे यांनी सांगितले. ही रोपे म्हणजे केवळ गवत एवढीच त्याची ओळख राहिल्यामुळे त्यावर आता तांबेरा रोगजंतूंची वाढ होणार नाही, ना त्यावरील संशोधन करता येणार आहे. त्यामुळे गेले सात-आठ महिने मोठ्या मेहनतीने वाढविलेल्या विविध जातीच्या गव्हावरील तांबेरा रोगाच्या संशोधनासाठी आता पुढील वर्षापर्यंत थांबण्याची वेळ आल्याने या गहू गेरवा संशोधन केंद्रामध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञ, निरीक्षक, अधिकारी व कर्मचारी यांची मेहनत वाया गेली आहे. आता तांबेरा रोगावरील संशोधन, निरीक्षण व त्याचे अनुमान पुन्हा पावसाळ्यानंतर त्याची लागवड करून ती वाढल्यानंतर करावे लागणार आहे. त्यासाठी सुमारे वर्षभर तरी थांबावे लागणार आहे, अशी भीतीही शास्त्रज्ञ व्यक्त करताना दिसत आहेत.

संशोधन केंद्र उभारणीपासून प्रथमच नुकसान 
संशोधन केंद्राच्या उभारणीपासून आजपर्यंत गव्हाच्या रोपांचे कडाक्‍याच्या थंडीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे येथील संशोधक मोठ्या खिन्न मनाने सांगत आहेत. मात्र, याचा गव्हाच्या शेतीवर, शेतकऱ्यांवर आणि संशोधनावर फार गंभीर व दूरगामी परिणाम होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT