World-Population-Day
World-Population-Day 
पश्चिम महाराष्ट्र

ग्रामीण लोकसंख्या वाढीचा दर घटतोय

विशाल पाटील

सातारा - लोकसंख्या वाढ जगापुढे समस्या उभी राहिली असताना सातारा जिल्ह्यात मात्र लोकसंख्या वाढीचा दर प्रत्येक जनगणनेला घटत आहे. १९६१ मध्ये झालेल्या जनगणनेवेळी वार्षिक चक्रवाढ वृद्धिदर हा १.९८ होता. त्यावरून तो २०११ मध्ये ०.६७ वर आला आहे. दुसरीकडे मात्र, शहरी भागात राहणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 

सातारा शहर व परिसरातील खेड, करंजे तर्फ सातारा, गोडोली, कोडोली येथील लोकसंख्या वाढीचा दशवार्षिक वृद्धिदर वेगाने वाढत आहे. 

लोकसंख्या वाढत असल्याने नवनवीन समस्या उद्‌भवत आहेत. त्यामध्ये शहरीकरणाचा वाढता वेग, बेरोजगारी, पायाभूत सुविधांचा वानवा या समस्या प्रचंड वेगाने वाढत आहेत. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी, तसेच शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसल्याने शहरांत राहण्यास येण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. सातारा जिल्ह्यातही ग्रामीण भागांतील लोकसंख्या कमी होत असून, शहरांत वाढत आहे. १९६१ च्या जनगणनेनुसार शहरी भागाचा वार्षिक चक्रवाढ वृद्धिदर -०.१२ होता. पुढे १९७१ मध्ये ३.६७, १९८१ मध्ये १.५८, १९९१ मध्ये १.७४, २००१ मध्ये २.३४, तर २०११ मध्ये तो ३.६६ इतका वाढला आहे. त्या तुलनेत ग्रामीण भागाचा कमी कमी होत 
आहे. 

जिल्ह्याचे ग्रामीण क्षेत्रफळ दहा हजार ४४ चौरस किलोमीटर इतके असून, त्यात २५ लाख २५ हजार ५४६, तर ४३५ चौरस किलोमीटर इतके शहरी भागाचे क्षेत्रफळ असून, त्यात सहा लाख ३० हजार ४१२ इतकी लोक राहतात. शहरी भागात १२ हजार ५४५ (२६.२३ टक्‍के), तर ग्रामीण भागात ८३ हजार ०१६ (१५.९७ टक्‍के) कुटुंबे दारिद्य्ररेषेखाली आहेत. 

शहरांतील लोकसंख्या वाढीचा दर (टक्‍के) - सातारा ११.२, फलटण २.६, कऱ्हाड -४.१, महाबळेश्‍वर ५.२, पाचगणी १२.२, म्हसवड १७.७, मलकापूर ४१.४, खेड १७.२, कोडोली ५९.०, करंजे तर्फे सातारा ३५.५, गोडोली ३४.४, कोरेगाव १०.३, रहिमतपूर ६.५, मेढा १२.५, पाटण १८.८, सैदापूर (कऱ्हाड) ३६.७, कऱ्हाड (ग्रामीण) ३५.० एकूण नागरी १६.२.-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT