NAMASKAR FOUNDATION  sakal
पिंपरी-चिंचवड

गरजू व भिकाऱ्यांसाठी आपुलकीचा ‘नमस्कार’

आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे अन्नदानाबरोबरच वैद्यकीय तपासणी व मोफत औषधपुरवठा

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : नागरिकांनी गरजू व भिकाऱ्यांना पैशांची भीक अथवा मदत न देता थेट अन्नदान करावे, कपडे किंवा औषधांची गरज असल्यास ती द्यावी, या उद्दात्त हेतूने निगडी-प्राधिकरण येथील नमस्कार फाउंडेशनचे काम सुरू आहे. परंतु कोरोना महामारीच्या पहिल्या टप्प्यात सुरू केलेले अन्नदान गेल्या सहा महिन्यांपासून अव्याहतपणे आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे सुरू आहे.

अन्नदानाच्या या उपक्रमाला काही प्रमाणात दानशूर नागरिक मदतही करत आहेत. परंतु पहिले तीन-चार महिने संपूर्ण व आताही सुमारे ७५ ते ८० टक्के खर्च नमस्कार फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सुहास जोशी हे आपल्या खिशातून करत आहेत.

नमस्कार फाउंडेशनची सुरुवात २००३ मध्ये निगडी-प्राधिकरण येथे झाली. फाउंडेशनचे आयुर्वेद जनजागृती शिबिर, सांस्कृतिक महोत्सवातून- वाचन, शास्त्र, संस्कृतीचा प्रचार गेले २० वर्षे संपूर्ण महाराष्ट्रासहित ५ राज्यांत कार्य सुरू आहे.

‘रोटी बँक’ या एका अभिनव अन्नदान उपक्रमाची सुरुवात २० सप्टेंबर २०२१ रोजी गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी झाली. सुरवातीला अन्न वाटप करण्यासाठी आकुर्डी रेल्वे स्टेशन येथील रिक्षाचालक व काही फळ विक्रेते यांची मदत झाली. नंतर काही अनधिकृत टपरी धारकांनी या उपक्रमास व वाटप करण्यासाठी येणारे नागरिक यांना नाहक त्रास देण्यास सुरू केली. दररोज ८० ते ९० लोक जेवण करतात. दुपारी १२.३० ते १ या वेळेत हे अन्नदान केले जाते.

गरजवंतांना महिन्यातून २ वेळा कपडे वाटप करून दोन वेळा डॉक्टर उपलब्ध करून दिले जातात. गरजू लोकांची जागेवरच तपासणी करून त्यांना लगेच औषधोपचार केले जातात. यामध्ये ३० टक्के लोक सातत्याने तेच असतात तर; ७० टक्के लोक बदलून येतात, असे जोशी यांनी सांगितले.

या कामासाठी ‘आकुर्डी रेसीडन्स’ या व्हॉट्स ग्रुपच्या राजेश्वरी अय्यर यांनी आवाहन केल्यानंतर खूप लोकस्वयंसेवक म्हणून मदत करायला येवू लागले आहेत. यामध्ये आनंद अय्यर, प्रीतम शिंदे, मुकेश चादुसमा, संतोष शेलार, अतुल भोंडवे आणि राजेश शिरोळे यांचे प्रामुख्याने अन्न वाटपासाठी सहकार्य असते, असेही त्यांनी सांगितले. स्थानिक नगरसेवक व पोलिस प्रशासनाने या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहनही जोशी यांनी केले आहे.

भीक मागणे हा एक आता उद्योग झाला आहे. रोख भीक दिली तर त्याचा दुरुपयोग होतो. त्याऐवजी त्यांना हवी असणारी मदत द्यावी. सिग्नलला भिकारी गोळा होतात. खेड्यातून, दुर्गम आदिवासी भागातून मुले आणून या भिकेच्या उद्योगात लावली जातात. लोकांनी रोख भीक देणे बंद करून आमच्या अभियानाला पाठिंबा द्यावा. मदतीसाठी ७३७८४९६१८६ या क्रमांकावर संपर्क साधावा

- सुहास जोशी, संस्थापक अध्यक्ष, नमस्कार फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT