pimpri sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी शहर तापाने फणफणले

वातावरणातील बदलाने विषाणूजन्य आजार वाढत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरात डेंगी तसेच विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहर अक्षरशः तापाने फणफणले आहे. या बाबत महापालिकेकडे निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही.

मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे साचलेल्या पाण्यात डेंगीच्या डासांचा प्रादुर्भाव वाढला. अनेकांना ताप असल्याचे दिसून येत आहे. वातावरणातील बदलाने विषाणूजन्य आजार वाढत आहेत. दिवसा ढगाळ वातावरण व कडक ऊन तसेच रात्री उकाडा यामुळे ताप, थंडी, सर्दी, खोकला व घशात खवखव अशा आजारांनी नागरिकांना घेरले आहे. अशातच शरीरातील प्रतिकारशक्ती कमी असल्याने रुग्णांमध्ये लहान मुले, वृद्ध नागरिकांचे प्रमाण अधिक आहे.

कचऱ्याचा ढीग, नाला, साठलेले पाणी असलेल्या परिसरात रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. यासाठी डासांचा नायनाट करण्यासाठी कीटकनाशक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, नुकतेच सण उत्सव झाले. यात अनेकजण गावी जाऊन आले तसेच गर्दी करून एकमेकांच्या संपर्कात आल्यानेही ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. यामुळे रुग्णालयातही गर्दी वाढत असल्याचे दिसून येत असून, ताप, सर्दीच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.

ही घ्या काळजी

  1. भरपूर पाणी प्यावे

  2. बाहेर पाठविताना लहान मुलांना अंगात पूर्ण कपडे घालावीत

  3. थंड पदार्थ खाणे टाळावे

  4. दुपारच्या उन्हात नागरिकांनी विनाकारण फिरू नये

  5. घराबाहेर पडताना पाणी बॉटल सोबत ठेवावी

  6. सायंकाळी घरातील डास कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात

  7. आजाराचा धोका टाळण्यासाठी आजार वाढण्यापूर्वी उपचार करून घ्यावेत

या भागात आढळताहेत रुग्ण

पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, वाकड, पिंपळे सौदागर, सांगवी, भोसरी, पिंपळे गुरव, काळेवाडी, कासारवाडी आदी भागात रुग्ण आढळत आहेत.

‘‘डेंगीसदृश रुग्णांसह वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य प्रमाण वाढत आहे. उष्णता वाढली असून, थंडीही वाढली आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये विषाणूजन्य आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. यासाठी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. काहीही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.’’

- डॉ. दीपाली अंबिके, बालरोग विभाग प्रमुख, वायसीएम, रुग्णालय

ऊन पावसाचा खेळ

सकाळी थोडी थंडी व त्यानंतर ऊन पावसाचा खेळ अशा मिश्र वातावरणामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अचानक वाढलेल्या उकाड्याने थंड पदार्थ खाण्याची इच्छा होते. मात्र, त्याचे शरीरावर उलट परिणाम होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT