पिंपरी, ता. २३ : ‘भारताला २०४७ मध्ये विश्ववंदित राष्ट्र करायचे असेल तर संतसाहित्य शिक्षणपद्धतीत येणे गरजेचे आहे!’, असे विचार शिवथरघळ येथील श्री सुंदर मठ सेवा समितीचे विश्वस्त डॉ. विजय लाड यांनी व्यक्त केले. प्रकाश उपासनी लिखित व मातृमंदिर विश्वस्त संस्था आयोजित ‘आठवणींच्या वाटेवर...’ या आत्मचरित्रपर कादंबरीचे प्रकाशन करताना डॉ. लाड बोलत होते. निगडीतील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष नितीन कारिआ, कार्यवाह डॉ. मनोज देवळेकर, उपाध्यक्षा शारदा चोरडिया, सुधीर कुलकर्णी, सुभाष देशपांडे, लेखक प्रकाश उपासनी नितीन हिरवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. लाड पुढे म्हणाले, ‘‘संतांनी मानवी जीवनातील सूक्ष्म व्यवहाराचा साक्षेपाने विचार केला आहे. ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘दासबोधा’त विज्ञानाचे अनेक दाखले आढळतात.’’ याप्रसंगी लेखक प्रकाश उपासनी यांनी आपल्या मनोगतातून, ‘मुल्हेरसारख्या छोट्या खेड्यातून वाटचाल करून दुभाषक म्हणून आंतरराष्ट्रीय अभ्यागतांशी सुसंवाद साधता आला. एवढेच नव्हे तर रशियामधील मास्को येथे जाण्याची संधी मिळाली. यासाठी पूर्वजांचा आध्यात्मिक वारसा पाठीशी आहे!’ अशा भावना व्यक्त केल्या. चंद्रशेखर जोशी, मीना उपासनी, मनोज मोरे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. अभिलेखा शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष देशपांडे यांनी आभार मानले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.