पिंपरी-चिंचवड

उद्‍घाटन तुम्ही करता की आम्ही करू

CD

पिंपरी, ता. २३ : महापालिकेने आंद्रा धरणातील पाणी आणून ते पाणी शुद्ध करण्यासाठी चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. या केंद्राचे काम पूर्ण होऊनही मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने उद्‌घाटनाअभावी शहरवासीयांना मुबलक आणि हक्काचे पाणी मिळत नाही. शहरातील पाणीटंचाईला जबाबदार असलेल्या प्रशासन आणि भाजपच्या नेत्यांनी ३१ मार्च २०२३ पर्यंत या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्‌घाटन न केल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने उद्‍घाटन करण्यात येईल आणि शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असा इशारा अजित गव्हाणे यांनी दिला आहे.
प्रचंड पाणीटंचाई असतानाही केवळ प्रसिद्धीचा हव्यास आणि कामाच्या श्रेयासाठी भाजपकडून शहरातील २७ लाखांहून अधिक जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पाण्याची मोठी समस्या जाणवत आहे. शहराला २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. ऐन पावसाळ्यात धरण तुडुंब भरलेले असतानाही शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे पाणीटंचाईमध्ये भरच पडू लागली आहे. शहरातील विविध भागातून दररोज अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या हजारो तक्रारी आहेत. याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे गव्हाणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

‘आंद्रा’चे १०० एमएलडी पाणी पहिल्या टप्प्यात येणार
आंद्रा व भामा आसखेड या दोन धरणातून २६७ एमएलडी पाणी शहराला मिळणार आहे. आंद्रा धरणाचे १०० एमएलडी पाणी शहरात पहिल्या टप्प्यात येणार आहे. यासाठी चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण होऊन चाचणीही झाली आहे. असे असताना महापालिका प्रशासन आणि शहरातील भाजपच्या नेत्यांना या जलशुद्धीकरण केंद्राच्या उद्‌घाटनासाठी मंत्र्यांना आणायचे आहे. मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने भाजपने २७ लाख लोकांना हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप चालविले आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्‍घाटन पुढील आठ दिवसांत करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा राष्ट्रवादीकडून या प्रकल्पाचे उद्‍घाटन करून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असा इशाराही या पत्रकाद्वारे गव्हाणे यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT