पिंपरी, ता. ६ : ‘‘मागील सहा महिन्यांपासून थकीत असलेले तब्बल दोन कोटी ४० लाख रुपयांचे अनुदान तीन दिवसांत केंद्रचालकांना वितरित करण्यात येणार आहे’’, अशी माहिती पुणे विभागाचे अन्नपुरवठा अधिकारी प्रशांत खताळ यांनी दिली.
सप्टेंबरपर्यंतचे सहा महिन्यांचे अनुदान थकले असल्याने केंद्रचालक आर्थिक अडचणीत सापडले होते. किराणा पुरवठादारांची देणी तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन भागवणे कठीण झाले होते. सध्या पिंपरी चिंचवड आणि पुण्यात मिळून सुमारे ४० शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांना दरमहा सुमारे ३८ ते ४० लाख रुपयांचे अनुदान मिळते. मात्र, मागील सहा महिन्यांचे देयक प्रलंबित राहिल्याने केंद्रांच्या कामकाजावर परिणाम झाला होता.
शिवभोजन थाळी कामगार, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त ठरते. केवळ दहा रुपयांत दोन पोळ्या, भाजी, भात आणि आमटी मिळते. प्रत्येक थाळीसाठी ग्रामीण भागांत २५ रुपये; तर शहरी भागांत ४० रुपये इतके अनुदान शासन देते. शासनाकडून थकीत रक्कम प्राप्त झाल्याने गुरुवारपासून सर्व केंद्रचालकांना ती वाटप केली जाणार आहे. यामुळे केंद्रचालकांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.