आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले...
- चार वर्षांच्या खंडानंतर लोकशाही पद्धतीने काम सुरू झाल्याची झलक आज दिसून आली
- महापालिकेने शहर विकसित केले आहे, त्यासाठी अनेकांचा हातभार लागला आहे
- भटक्या कुत्र्यांचा प्रश्न प्रामुख्याने मांडला गेला, त्यातील कुत्र्यांचे संतती नियमन, रेबिज प्रतिबंधक, शेल्टर उभारणे, याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्याचा आदेश प्रशासनाला देत आहे
- पाणी कोटा पाहिजे तेवढा शहराला मिळालेला नाही. भामा आसखेड पाणी योजना व रखडलेले अन्य प्रकल्प पूर्ण करण्याचे व समन्याय पद्धतीने पाणीवितरण करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली जाईल
- पाणी कोटा वाढवण्यासाठी पाइप लाइन योजना, पुनर्वापर, मागील बंधाऱ्यातून घेता येईल का याची पडताळणी केली जाईल
- अवजड वाहनांच्या धोरणाबाबत पोलिस व आरटीओ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊ
- स्मार्ट सिटी प्रकल्पातील कामे लवकरात लवकर महापालिकेच्या संबंधित विभागांकडे वर्ग करून कार्यवाही केली जाईल
- मेट्रोच्या कामामुळे खराब झालेला रस्ता दुरुस्त केला जाईल
- मिळकतकराबाबत अभय योजना लागू करण्याबाबत विचार केला जाईल. नवीन धोरणानुसार जास्तीत जास्त किती वर्षे मागे जाऊन बांधकामांना कर आकारणी होईल
- दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार व दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे शहरासाठीचे योगदान आणि त्याबाबत केल्या गेलेल्या सूचनांचा विचार होईल
- प्रशासन सजग, लोकाभिमुख राहील, यासाठी आयुक्त म्हणून मी कटिबद्ध आहे
---