पिंपरी-चिंचवड

मावळात भाताचा नापेरा होण्याची भीती

CD

वडगाव मावळ, ता. २ : सततच्या पावसामुळे मावळ तालुक्यात संपूर्ण क्षेत्रावर भाताचा नापेरा होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेमार्फत पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी पुणे जिल्हा किसान युनियनचे अध्यक्ष माऊली दाभाडे यांनी केली आहे.

किसान युनियनच्या वतीने याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देण्यात आले आहे. मावळ तालुका हा खरीप भात पीकाचा म्हणून शासन दप्तरी नोंद आहे. भौगोलिक परिस्थिती आणि आतिवृष्टीमुळे कोरडवाहू भात हे एकच मुख्य पीक मावळ तालुक्यातील शेतकरी घेत असतो. यंदा ६ मे रोजी पाऊस सुरू झाल्यापासून आजपर्यंत तो थांबलेला नाही. पावसात दोनदा भाताचे बी टाकूनही वापसा नसल्यामुळे व अति पावसामुळे भाताच्या रोपांची उगवण झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण भात क्षेत्रात म्हणजेच मावळ तालुक्यात सुमारे १३ हजार हेक्टरमध्ये नापेरा होण्याची दाट शक्यता आहे. कृषी व महसूल या शासकीय यंत्रणांकडून पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल प्राप्त करून राज्य शासनाला सादर करावा. मावळासह भोर, वेल्हा, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर या खरीप व कोरडवाहू शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई मिळण्याबाबत योग्य तो अहवाल सादर करावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

PM Narendra Modi: ''घाना देशातल्या ९०० प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांची गुंतवणूक'', द्वीपक्षीय संबंधांवरही मोदी स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT