पिंपरी-चिंचवड

पोटनिवडणुकीकडे देशाचे लक्ष ः दानवे

CD

उद्धव ठाकरे यांच्याकडूनच
जनता व भाजपला धोका
थेरगावमध्ये रावसाहेब दानवे पाटील यांची टीका

वाकड, ता. २० : उद्धव ठाकरे यांनीच जनतेला आणि भाजपला धोका दिला आहे. त्याचबरोबर ते दोन वर्षात कधीही मंत्रालयात गेले नाहीत, अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी थेरगाव येथे सोमवारी केली. भाजप महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, झामाबाई बारणे, सिद्धेश्वर बारणे, काळूराम बारणे आदी उपस्थित होते.
दानवे म्हणाले, ‘‘चिंचवड निवडणुकीच्या निकालावर देशातील किंवा राज्यातील राजकारणावर फरक पडणार नाही. मात्र, देशातील राजकारणाचे वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत, हे स्पष्ट होणार असल्याने साऱ्या देशाचे लक्ष या पोटनिवडणुकीकडे लागले आहे.’’


दानवे म्हणाले ...
- राज्याच्या राजकारणात पाच-सहा महिन्यांपासून ज्या घडामोडी सुरू आहेत. त्यावरही जनतेचे लक्ष
- आमचा फोन घेतला नाही. केवळ ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे ब्रीद वाक्य बोलून उद्धव ठाकरे निर्धास्त राहिले
- शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कधीही निवडणुका न होता, नियुक्त्या झाल्या हे घटनाबाह्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: कुलदीप यादवचा राजस्थानला दुहेरी धक्का! एकाच षटकात दोन फलंदाजांना धाडलं माघारी

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT