पुणे - प्रलंबित मागण्यांसाठी अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले विद्यापीठ बंद आंदोलन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आश्वासनानंतर गुरुवारी सायंकाळपूर्वी मागे घेण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांमधील मोठा अडथळा दूर झाला आहे. दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुरुवारी विद्यापीठ बंद आंदोलन केल्याने, विद्यापीठाच्या सर्व कार्यालयांना कुलूप होते.
प्रलंबित मागण्यांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या चर्चेतून कोणताही निर्णय होत नसल्याने गुरुवारी कर्मचाऱ्यांकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासोबत राज्यातील विद्यापीठांमध्ये विद्यापीठ बंद आंदोलन करण्यात आले. विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्य इमारतीच्या समोर ठिय्या आंदोलन केले. तसेच कोणत्याही कार्यालयाचे कुलूप उघडण्यात आले. त्यामुळे विद्यापीठातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कार्यालयाबाहेर काही काळासाठी राहावे लागले.
राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या सदस्यांनी बेमुदत लेखणी बंद आंदोलन पुकारले. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांच्या कामकाजावर परिणाम झाल्याने विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या परीक्षांचे नियोजन करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. या मागण्यांबाबत गुरुवारी कृती समितीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन, त्यांना परिस्थितीची माहिती दिली. त्याचवेळी उदय सामंत यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा झाली. सामंत यांना कोरोना झाल्यामुळे त्यांच्यावर सुरू असलेले वैद्यकीय उपचार, अंतिम वर्षाच्या परीक्षा, उच्च व तंत्रशिक्षण विभागातील स्थिती आदींचा विचार करुन आंदोलन मागे घेण्यात आल्याचे समितीचे डॉ. सुनील धिवार यांनी सांगितले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आश्वासन दिले. या आश्वासनांची १७ ऑक्टोबरपर्यत पूर्तता न झाल्यास १९ ऑक्टोबरपासून पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कृती समितीने दिला आहे.
मुलींचे लग्न कसे करावे : सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे म्हणणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तब्बल ३७ वर्ष सेवा केल्यानंतर सुरेंद्र नायडू हे २०१७मध्ये शिक्षण अधिकारी म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या दोन मुलींपैकी एकीचे लग्न व्हायचे आहे. पण आता सरकारने आश्वासित प्रगती योजना रद्द केल्याने तिचे लग्न कसे करायचे, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. "ही योजना रद्द झाली आणि सरकारने निवृत्ती वेतनात कपात सुरू केली असल्याने सध्या हातात १२ हजार रुपये पडत आहेत. तर ग्रॅज्युटी कमी केले आहेत. त्यामुळे आता मुलींचे लग्न कसे करू", असे सांगत नायडू यांनी आपली व्यथा मांडली.
महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
परीक्षेबाबत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बैठक आंदोलकांनी हाणून पडली
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या नियोजनासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक दुपारी सुरू होती. मात्र विद्यापीठात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असताना देखील सुरू असलेली ही बैठक आंदोलकांनी हाणून पडली. परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या अतिथी गृहात गुरूवारी दुपारी बैठक सुरू होती आणि त्यात अधिकारी आणि काही शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते. हे कळताच आंदोलकांपैकी ४०-५० जणांनी बैठकीच्या ठिकाणी मोर्चा वळविला आणि बैठक बंद पडली.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या :
सातव्या वेतन आयोगाची अधिसूचना जाहीर करुन, तो तातडीने लागू करावा
आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा
पदोन्नतीबाबत तत्काळ निर्णय घ्यावा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.