एनआयबीएम (कोंढवा) - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘एनआयबीएम’च्या टपाल तिकिटाचे बुधवारी प्रकाशन करण्यात आले. या वेळी (डावीकडून) शक्तिकांत दास, सविता कोविंद, कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी, डॉ. के. एल. धिंग्रा.
एनआयबीएम (कोंढवा) - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘एनआयबीएम’च्या टपाल तिकिटाचे बुधवारी प्रकाशन करण्यात आले. या वेळी (डावीकडून) शक्तिकांत दास, सविता कोविंद, कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी, डॉ. के. एल. धिंग्रा. 
पुणे

बॅंकांनी विश्‍वास कायम राखावा - रामनाथ कोविंद

सकाळवृत्तसेवा

पुणे - सार्वजनिक पैशाचे संरक्षक म्हणून बॅंकांची जबाबदारी महत्त्वाची आहे. यामुळे जनतेचा बॅंकांवर असलेला विश्‍वास कायम ठेवण्यासाठी बॅंकांनी प्रयत्नशील राहणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी केले.

‘नॅशनल इस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग अँड मॅनेजमेंट’च्या (एनआयबीएम) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होते. या वेळी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी, परिवहन तथा संसदीय कार्यमंत्री अनिल परब, रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास, ‘एनआयबीएम’चे संचालक डॉ. के. एल. धिंग्रा उपस्थित होते. पुढे बोलताना राष्ट्रपती म्हणाले, ‘‘देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळी बॅंकिंग क्षेत्रासमोर अनेक आव्हाने होती. त्या वेळी ग्रामीण भागात बॅंकिंग व्यवस्था पोचली नव्हती. मात्र, ‘एनआयबीएम’सारख्या संस्थांनी प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळाची निर्मिती करून बॅंकिंग व्यवस्था बळकट केली. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळी बॅंकांच्या जेवढ्या शाखा होत्या तेवढ्या शाखा आता बॅंकांकडून दरवर्षी सुरू केल्या जातात. भारताचे पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यामध्ये बॅंकांची महत्त्वाची भूमिका ठरेल.’’ 

‘ग्रामीण भागात मुख्यतः गरीब लोकांना बॅंकिंग सेवा उपलब्ध होत नव्हती. मात्र, जनधन योजनेमुळे बॅंकिंग सेवा तळागाळात पोचली आहे. जनधन योजनेंतर्गत आत्तापर्यंत ३५ कोटी खाती उघडण्यात आली आहेत. मुद्रा योजनेच्या माध्यमातून बॅंकांनी गरजू उद्योजकांना निधी उपलब्ध करून द्यावा. देशातील शेवटच्या नागरिकापर्यंत बॅंकिंग सेवा पोचविणे आवश्‍यक आहे,’’ असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT