wari.jpgwari.jpg 
पुणे

आषाढी वारीबाबत महत्वाची बातमी; पादुकांबाबत काय झाला निर्णय, वाचा सविस्तर

सकाळवृत्तसेवा

पुणे : जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी 12 जून आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी 13 जून रोजी प्रस्थान करणार आहे. पालखी प्रस्थान सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. जगद्गुरू तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली या दोन्ही संस्थानची सोमवारी बैठक झाली. पादुका मंदिराबाहेर नेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा करता येतो तर पालखी सोहळा का करता येणार नाही, अशी मागणी वारकऱ्यांनी केली होती. ही मागणी पोलिसांनी फेटाळली आहे.

आता पालखी प्रस्थान सोहळा किती मानकऱ्यांच्या उपस्थितीत करायचा याबाबत राज्य सरकारकडून सूचनांसाठी एक नवा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

प्रस्थान ठेवल्यानंतर तुकाराम महाराजांच्या पादुका भजनी मंडपातच विसावतील, तर मंदिर प्रदक्षणा झाल्यानंतर शासन निश्चित करेल. त्या ठिकाणी माऊलींच्या पादुका विसावतील. देहू पालखी सोहळाप्रमुख माणिक महाराज मोरे आणि आळंदी मंदिर समितीचे मुख्यविश्वस्त अॅड. विकास ढगे पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. 12 तारखेला पालखी प्रस्थान असून मंदिरांमध्ये पालखी, पालखी रथ, अब्दगिरी गरुडटक्के, चौरंग, पाट पादुका या सर्वांना चांदीचा मुलामा देण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा सोहळा इतिसाहासात पहिल्यांदाच रद्द करावा लागला आहे. मात्र माऊली आणि इतर संतांच्या पादुका श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मात्र नेण्यात येणार आहेत. त्या कशा न्यायच्या यावर अजुन निर्णय झालेला नाही.

पालखी सोहळ्यात महाराष्ट्रातून तब्बल 10 लाख भाविक पायी चालत पंढरपूरला जात असतात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जिवनातला हा सर्वात मोठा सोहळा मानला जातो.

संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदीमधून आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी देहूमधून महिनाभर आधी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात. त्याचबरोबर महाराष्ट्रातून विविध संतांच्या शेकडो दिंड्याही त्यात येवून मिसळतात. तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त वैष्णवांचा मेळा हा आपल्या लाडक्या दैवताला भेटण्यासाठी जात असतो. या वारी परंपरेला शेकडो वर्षांची परंपरा आहे. वादळ, वारा, उन, पाऊस अशा कशाचीही तमा न बाळगता वारकरी कुठल्याही संकटाची पर्वा न करता अतिशय आनंदात या सोहळ्यात सहभागी होत असतात.
Video : कोरोना योद्धा म्हणायचं अन् पगार कपात करायचा?; पुण्यात नर्सेसचे आंदोलन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

SCROLL FOR NEXT