पुणे

'विश्‍वशांतीसाठी बंधुतेची आवश्‍यकता'

सकाळवृत्तसेवा

पिंपरी -  ‘‘अणुचाचण्यांमुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. ते टाळून विश्‍वशांती निर्माण करण्यासाठी राज्यघटनेतील बंधुता तत्त्वाची गरज आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. 

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व भगवान महावीर शिक्षण संस्था यांच्यातर्फे भोसरी येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित विसावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन व प्रा. प्रकाश पगारिया व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदावरून डॉ. सबनीस बोलत होते. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. भास्करराव आव्हाड यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन झाले. बंधुता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे, मुख्य संयोजक प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर, प्राचार्य डॉ. अशोक शिंदे, महेंद्र भारती, कवी चंद्रकांत वानखेडे, कवयित्री मधुश्री ओव्हाळ, संगीता झिंजुरके, सेवानिवृत्त परिवहन अधिकारी हरिश्‍चंद्र गडसिंग आदी उपस्थित होते. 

डॉ. सबनीस यांच्या भाषणाचे ‘आम्ही भारतीय’, डॉ. नयनचंद्र सरस्वते यांच्या ‘बंधुताचार्यांची प्रकाशगाथा’, ‘अग्निकुंड’ या ग्रंथांचे आणि ‘मूल्याविष्कार’ स्मरणिकेचे प्रकाशन झाले. संमेलनानिमित्त राष्ट्रीय एकात्मता संदेश यात्रा काढण्यात आली. 

डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘महंमद पैगंबरांपासून येशू ख्रिस्तांपर्यंत, संत ज्ञानेश्‍वरांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सर्व संत, माहात्म्य, महापुरुषांनी विश्‍वशांतीचा संदेश दिला आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी राज्यघटनेत स्वातंत्र, समता, बंधुता, सामाजिक न्याय या चार तत्त्वांचा अंगीकार केला आहे. त्यातील बंधुतेचा राज्यकर्त्यांसह अनेकांना विसर पडला आहे. राज्या-राज्यांमध्ये, देशा-देशांमध्येच नव्हे, तर कामगार व भांडवलदार, स्त्रिया व पुरुष यांच्यात बंधुभाव वाढवावा लागणार आहे. कारण, भावना व विचारांच्या एकत्रिकरणात बंधुता आहे. तिच्याशिवाय समता प्रस्तावित होणे शक्‍य नाही.’’

उद्‌घाटक ॲड. आव्हाड म्हणाले, ‘‘आपली राज्यघटना ही सर्वांत मोठे साहित्य आहे. तिच्या उद्देशपत्रिकेतच सर्व सार आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. बंधुतेचा विचार रुजविणाऱ्या महापुरुषांना आपण जातीयतेत व समाजासमाजात वाटून घेतले आहे. त्यामुळे आम्ही दिशाहीन झालो आहोत. स्वार्थी राजकारणाच्या आहारी गेलो आहोत. यातून बाहेर पडण्यासाठी व समाजाला जागे करण्यासाठी बंधुतेची गरज आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT