Water-Theft
Water-Theft 
पुणे

पाणीचोरी रोखण्याचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहरातील पाणी गळती आणि चोरीचे प्रमाण ३५ टक्के आहे. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन टाकणे, अनधिकृत नळजोड अधिकृत केले जात आहेत. मात्र योजनेचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे.

महापालिकेचे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने राजकीय लागेबांधे असलेल्या बहुतांश नागरिकांनी मंजूर अर्धा इंचाऐवजी पाऊण व एक इंच व्यासाच्या पाइपद्वारे नळजोड घेतले आहेत. काहीजण घरातील नळांना विद्युतपंप लावून जादा पाणी खेचतात. हे लक्षात येत नसल्याने पाणी गळती व चोरी रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

नळांना विद्युतपंप
प्राधिकरणासह शहराचा बहुतांश भाग उंच-सखल आहे. काहींनी वाढीव बांधकामे करून भाडेकरू ठेवले आहेत. काही व्यावसायिक कारणासाठी वापर करतात. त्यांना जादा पाण्याची गरज आहे. त्यासाठी नळांना विद्युतपंप लावून पाणी खेचत आहेत. त्यामुळे उंच भागातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही.

फुकट पाण्याची विक्री
नळाचे पाणी २० लिटर जारमध्ये भरून विक्री करण्याचे प्रकार सर्रासपणे घडत असल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत आढळले. चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी आदी भागांत महापालिकेने सार्वजनिक नळकोंडाळे उभारले आहेत. चऱ्होली, डुडुळगाव, दिघी, वडमुखवाडी, चोविसावाडी, आळंदी भागातील नागरिकांना ते विकले जातात. पाणी भरण्याच्या ठिकाणापासून जारची किंमत २०, २५ व ३० रुपये आकारली जाते. काळेवाडी, वाल्हेकरवाडी, किवळे, पुनावळे, ताथवडे भागातही असेच चित्र बघायला मिळाले. येथे काही जण घरगुती नळाचे पाणी जारमध्ये भरून विकत असल्याचे आढळले. 

मुबलक तरीही...
पवना धरण शंभर टक्के भरले आहे. पवना नदी दुथडी भरली आहे. रावेत बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे. त्यालगतच्या अशुद्ध जलउपसा केंद्रातून मंजूर कोट्याप्रमाणे रोज ४८० दशलक्ष लिटरपर्यंत पाणी उचलले जात आहे. तरीही शहराच्या बहुतांश भागांत अपुरे व कमी दाबाने पाणी मिळत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

आरोप-प्रत्यारोप
मार्चपासून शहरात पाणीकपात सुरू होती. १५ दिवसांपूर्वी महापौरांनी पवना धरणातील पाण्याचे पूजन केले. दररोज पाणीपुरवठा सुरू झाला. तरीही पाण्याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या. परिणामी आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. यात टॅंकरलॉबीचा हात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. तर वाढलेली लोकसंख्येमुळे वाढलेली मागणी, गळती व चोरी यामुळे पाणी समस्या निर्माण झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT