पुणे

शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी 'या' गोष्टींना प्राधान्य : मधुकांत गरड

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड : बाजारात पुणे जिल्ह्यासह राज्य आणि परराज्यातून मोठ्या प्रमाणात शेतीमाल माल येतो. यामध्ये बाजारात शेतीमाल जास्त आला की, त्याला कवडीमोल भाव मिळून शेतकर्‍यांचा तोटा होतो. तर बाजारात कमी माल आल्यास ग्राहकांना फटका बसतो. तसेच नाशवंत शेतीमाल वेळेत विकला गेला नाही, तर तो फेकूनच द्यावा लागतो. यासाठी बाजारात शीतगृह उभारता येईल का? या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. त्यामुळे नाशवंत शेतीमालाचे नुकसान होणार नाही. तसेच येत्या काळात नाशवंत मालाला प्राधान्य देणार असल्याचे बाजार समितीचे नवनियुक्त प्रशासक मधुकांत गरड यांनी गुरूवारी सांगितले.

गरड म्हणाले, मार्केट यार्डातील घाऊक बाजारात घाऊकच व्यवसाय झाला पाहिजे. अन्यथा घाऊकमध्ये किरकोळ विक्री होत असेल, तर त्याचा वाहतूक कोंडीपासून सर्वच गोष्टीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. तसेच मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारीच किरकोळ बाजार आहे. त्यामुळे गाळा किंवा गाळ्याच्या समोरची किरकोळ विक्री थांबली पाहिजे. किरकोळ विक्रीमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. तसेच बाजारातील गर्दीही वाढते. त्यामुळे किरकोळ विभागातच किरकोळ विक्री झाली पाहिजे. गाळ्यावर घाऊकच विक्री व्हावी. किरकोळ विक्रीबाबात विचार-विनीमय करून निर्णय घ्यावा लागेल.

शेतीमालाचा प्रचार व प्रसार करून शेतकर्‍यांना भाव मिळवून देण्यासाठी काही करता आले, तर नक्की केले जाईल. बाजारात होणारी शेतमालाची आवक असमतोल आहे. त्यामुळे कधी किलोभर भाजीसाठी कधी शंभर रूपये मोजावे लागतात, तर कधी तीच भाजी दहा रूपयात मिळते. बाजारात जास्त आवक झाल्यास शेतकर्‍यांना भाज्या फेकून द्याव्या लागतात. या असमतोलतेमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येतो. त्यामुळे बाजारात येणार्‍या भाज्यांच्या प्रमाणात समतोल राखण्यासाठी नियोजन करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा मिळेल. असे ही गरड यांनी यावेळी सांगितले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हिताचे निर्णय तातडीने- बाजार समितीचा नुकताच पदभार स्विकारला आहे. बाजारातील अडचणी आणि प्रश्नांची माहिती घेत आहे. जे जे बाजाराच्या आणि बाजार घटकांच्या हिताचे आहे. ते सर्व निर्णय तातडीने घेतले जातील. शेतकर्‍यांच्या शेतीमालाला कायम प्राधान्य असेल. बाजार समितीच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने पावले उचचली जातील. तसेच नियमनमुक्त निर्णयाचा भुसार बाजाराला फटका बसणार असेल, तर त्याबाबतही योग्य भूमिका घ्यावी लागेल. असेही मधुकांत गरड यांनी सांगितले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT