Climate Action Sakal
पुणे

Climate Action : हवामानबदल रोखण्यासाठी कृती आराखडा, डॉ. घोरपडे यांची माहिती; ५० वर्षांत उष्ण दिवसांची संख्या दुप्पट

Maharashtra For Environment : राज्य हवामान कृती आराखड्याच्या अंमलबजावणीतून कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : हवामान बदल तसेच कार्बन उत्सर्जनाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी राज्य हवामान कृती आराखड्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यामुळे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास राज्याच्या ‘राज्य हवामान कृती कक्षा’चे संचालक डॉ. अभिजित घोरपडे यांनी व्यक्त केला.

‘भवताल फाउंडेशन’ आणि ‘मायक्रो इनोटेक’ यांच्यातर्फे ‘हवामान बदलाचे आव्हान पेलायचे कसे?’ या विषयावर ‘भवताल टॉक’चे या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी डॉ. घोरपडे बोलत होते. हवामानशास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल, हवामानशास्त्रज्ञ डॉ. विनीत कुमार सिंग, भवताल फाउंडेशनचे संस्थापक-संचालक अभिजित घोरपडे, देवानंद लोंढे, ‘मायक्रो इनोटेक’चे राजेश पवार उपस्थित होते.

डॉ. घोरपडे म्हणाले, ‘‘जागतिक स्तरावर शहरे हवामान बदलाच्या केंद्रस्थानी आहेत. सर्वाधिक कार्बन उत्सर्जन इमारतींमधून होते. याचा नागरिकांवर आणि पर्यायाने पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे महाराष्ट्राने ‘स्टेट कूलिंग ॲक्शन प्लॅन’ (एसएपीसीसी) सुरू केला आहे. वाढते तापमान, उष्णतेच्या लाटा, अनियमित पर्जन्यमान, समुद्राच्या पातळीत वाढ, दुष्काळ, पूर आणि चक्रीवादळे अशा हवामान घटनांची वारंवारिता आणि तीव्रता सतत वाढत आहे. ५० वर्षांत उष्ण दिवसांची संख्या दुप्पट झाली आहे.’’

डॉ. कोल म्हणाले, ‘‘कार्बन वायूंच्या उत्सर्जनाचा वेग झपाट्याने वाढत आहे. यामुळे समुद्राचे तापमानही झपाट्याने वाढत आहे. परिणामी पावसाचा पॅटर्न बदलत आहे. अनियमित आणि अनियंत्रित पाऊस पडत आहे. परिणामी शेतीच्या नुकसानीचे मोठे आव्हान सर्वांसमोर आहे.’’

डॉ. सिंह म्हणाले, ‘‘गेल्या २० वर्षांत चक्रीवादळांची संख्या ५० टक्क्यांनी वाढली असून, वेग १५० किलोमीटर प्रती तास एवढा झाला आहे. वादळे कधी तीव्र होतात, तर कधी लवकर निष्क्रिय होतात. वादळाने उग्र रूप धारण केल्यावर पुढील १२ तासांचा अंदाज देण्यासाठीची यंत्रणा अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे.’’ त्रिलोक खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. अभिजित कुलकर्णी यांनी आभार मानले.

गेल्या दशकात दुष्काळाची वारंवारता दुप्पट झाली, चक्रीवादळे तिप्पट झाली आणि पुराचे प्रमाण चौपट झाले. हे आव्हान पेलण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.

- डॉ. अभिजित घोरपडे, संचालक, राज्य हवामान कृती कक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT