Family
Family 
पुणे

दमलेल्या बाबाच्या कसरतीची कहाणी

सकाळवृत्तसेवा

पुणे - पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत मुले कशी मोठी होत ते कळत नव्हतं. मुलांची काळजी घेण्यासाठी आजी-आजोबांपासून ते काका-काकूंपर्यंत सर्वजण घरात होते. पण, आता त्रिकोणी कुटुंबात आई-वडील हे दोघंच त्या एकुलत्या एक मुलाचे सर्व असते. त्यामुळे कुटुंबाला वेळ देताना ‘बाबा’लोकांना कसरत करावी लागत असल्याचा निष्कर्ष पुण्यातील नोकरदारांच्या पाहणीतून निघाला आहे. 

आधुनिक काळात शहरातील वाडे जमीनदोस्त होऊन त्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे ‘वाडा संस्कृती’ जाऊन तेथे ‘फ्लॅट संस्कृती’ विकसित आली. त्याचबरोबर वाड्यातील एकत्र कुटुंब पद्धतीही मोडीत निघाली. त्याचे दृश्‍य परिणाम आता दिसत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने ३५ ते ४५ या वयोगटातील पुरुषांचे सर्वेक्षण केले. त्याच्या विश्‍लेषणातून हा निष्कर्ष निघाला आहे. नोकरी आणि विवाहानंतर किमान १० ते १५ वर्षे झालेल्यांचा समावेश या प्रातिनिधिक सर्वेक्षणात करण्यात आला आहे. 

पत्नी आणि मुलासोबत एकत्र वेळ घालवण्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होणे, हा अनेकांना एक प्रभावी मार्ग वाटतो. ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘फॅमिली रन’ हा त्यातील एक भाग होता. त्यातून कुटुंब म्हणून प्रथमच एकत्र ‘ट्रॅक’वर उतरलो. त्यातून कुटुंबासोबत चांगला वेळ घालविता आला. पुण्यातील वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा एकत्रित आनंद घेणे हीदेखील आमच्यासाठी पर्वणी असते. ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’, ‘वसंतोत्सव’ अशा कार्यक्रमातून कुटुंबातील एकमेकांची आवड जोपासता येते, असे अनेकांनी सांगितले.

असे केले सर्वेक्षण
सरकारी, खासगी, वैद्यकीय, शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी करणाऱ्या १०० लोकांना प्रातिनिधिक प्रश्‍न विचारण्यात आले. त्यात तुमचा सर्वाधिक वेळ कुठे जातो, तुमचे सर्वाधिक प्राधान्य कशाला असते आणि मुलांना वेळ देता येतो का, अशा तीन प्रश्‍नांच्या उत्तराचे विश्‍लेषण करण्यात आले. हे प्रश्‍न सरकारी सेवेतील वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विचारण्यात आले. तसेच, वकील, कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही विचारले.

कामाच्या ठिकाणी सर्वाधिक वेळ
  कामाच्या ठिकाणी सर्वाधिक वेळ जातो असे १०० पैकी ८० जण म्हणतात.
  २० जण म्हणतात कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरावे लागते.
  कुटुंबाला प्राधान्य असते असे ९० जण म्हणतात.
  कुटुंबाबरोबर कामाला आणि मित्रांना महत्त्व असते असे १० जण म्हणतात. 
  मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही, यावर सर्वजणांचे एकमत दिसते. 
  त्यांच्या वडिलांनी त्यांना जितका वेळ दिला तितका देता येत नसल्याची खंत.

निष्कर्ष
  सर्वाधिक प्राधान्य हे कुटुंबाला असते.
  सर्वाधिक वेळ हा कामाच्या ठिकाणी जातो.
  मुलांच्या शाळांमधील बैठकांना उपस्थित राहण्यासाठी वेळ मिळत नाही.
  कामाच्या निमित्ताने दहा ते बारा तास घराबाहेर राहावे लागते.

कामाच्या ठिकाणचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी होणारी धावपळ यात बराचसा वेळ जातो. त्यामुळे आठवड्याच्या पाच-सहा दिवसांमध्ये मुलाशी जेमतेम बोलणे होते. मात्र, सुटीच्या दिवशी पूर्ण वेळ कुटुंबासाठी देण्यास प्राधान्य देतो.
- संतोष लोखंडे, खासगी कर्मचारी

कामावरून घरी आल्यानंतर शांतता हवी असते. टीव्ही, मोबाईल, म्युझिक सिस्टीम अक्षरक्षः नको वाटते. त्यामुळे पत्नी आणि मुलांशी गप्पा मारणे याला सर्वाधिक प्राधान्य देतो.
- अविनाश सोनवणे, सरकारी कर्मचारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

SCROLL FOR NEXT