बैलगाडा शर्यत  sakal
पुणे

"बैलगाडा शर्यत बंदी संदर्भात न्यायालयीन लढाई लढू"

राज्याचे अॅडव्होकेट जनरल व नामांकित वकील यांच्या सोबत बैलगाडा संघटनेच्या प्रतिनिधीची लवकरच बैठक आयोजित केली जाईल

सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पारगाव : बैलगाडा शर्यत बंदी संदर्भात न्यायालयीन लढाई लढून सर्वोच्य न्यायालयात प्रलंबित असलेले सुनावणी लवकरात लवकर होऊन निकाल लागण्यासाठी प्रयत्न सुरु असून आपली बाजू कायदेशीररित्या भक्कम करण्यासाठी राज्याचे अॅडव्होकेट जनरल व नामांकित वकील यांच्या सोबत बैलगाडा संघटनेच्या प्रतिनिधीची लवकरच बैठक आयोजित केली जाईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

पारगाव ता. आंबेगाव येथील भीमाशंकर साखर कारखान्यावर संपूर्ण राज्यभरातून आलेल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या सभासदांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन बैलगाडा मालकांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा केल्याबद्दल श्री वळसे पाटील यांचा देशी गाई वासराची प्रतिकृती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी माजी आमदार पोपटराव गावडे, मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम , मानसिंग पाचुंदकर , विश्वास कोहकडे व अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे बाळासाहेब आरुडे, संदीप बोदगे, शिवाजी निघोट, रामभाऊ टाकळकर , सर्जेराव खेडकर , पप्पू येवले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

वळसे पाटील पुढे म्हणाले, बैलगाडा शर्यत सुरु झाली पाहिजे हे जसे शेतकर्यांना वाटते तसेच आम्हालाही सुरु व्हावी असे वाटते शर्यतीला सर्व पक्षांचा तसेच राज्य व केंद्र शासनाचाही पाठींबा आहे कोणी विरोध करणारच नाही राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. चार नामांकित वकिलांची नेमणूक केली आहे. एक दोन सुनावन्या झाल्या त्यानंतर कोरोनो मुळे सुनावणीस विलंब झाला. सुप्रीम कोर्टाची लवकरात लवकर तारीख घेऊन सुनावणी होण्यासाठी राज्याचे वकील सचिन पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. सुनावणीची तारीख लवकरच मिळेल, देशातील काही राज्यात शर्यत सुरु आहे कारण त्या ठिकाणी आव्हान दिले गेले नाही.

आपल्या राज्यात प्राणी मित्र संघटनेने आव्हान दिल्याने स्थगिती आली आहे. संरक्षित प्राण्यांच्या यादीतील बैलाचे नाव काढण्यासाठी खासदार अमोल कोल्हे दिल्लीत प्रयत्न करत आहेत. यादीतील बैल नाव वगळल्यास आपणाला आपल्या बाजूने निकाल लागण्यास मदत होणार आहे आपण लवकर निकाल लागण्यास प्राधान्य देऊ एकदा निकाल लागल्यास आपणाला पुढील धोरण ठरवता येईल कायदेशीर मार्गाने आपण चाललो आहे तोच मार्ग योग्य आहे सुप्रीम कोर्टाचा तिढा सुटल्याशिवाय आपणाला काहीही करता येणार नसल्याचे श्री वळसे पाटील यांनी सांगितले. प्रास्ताविक बाळासाहेब आरुडे यांनी केले सूत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले तर आभार रामभाऊ टाकळकर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT