पुणे

लॉकडाऊनचा फटका; आर्थिक अडचण मग कुटुंबातील चौघांनी घेतला गळफास अन्...

सकाळवृत्तसेवा

पुणे : बिबवेवाडी येथील सुखसागरनगरमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील 4 जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री उघडकीस आला. दरम्यान, आर्थिक विवंचनेतुन ही आत्महत्या घडली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

अतुल दत्तात्रय शिंदे (वय 33), त्यांच्या पत्नी रा. जया अतुल शिंदे (वय 32), ऋग्वेद अतुल शिंदे (वय 6) व अंतरा अतुल शिंदे (वय 3, सर्व रा.अहिरन्त, सर्वे नं 15/1, गल्ली क्रमांक 1, सुखसागर नगर) अशी आत्महत्या केलेल्याची नावे आहेत. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखसागरनगर येथील एका कुटुंबातील चार जणांनी गळफास घेतला असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला गुरुवारी रात्री अकरा वाजता मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थली धाव घेतली. त्यावेळी घरामध्ये शिंदे कुटुंबातील पती, पत्नी व त्यांच्या दोन मुलानी अशा एकूण चार जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले. संबंधित कुटुंबाने एक ते दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केली असण्याची शक्यता ही पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णलयात पाठविले. आत्महत्या करण्याचे ठोस कारण अद्याप पुढे आलेले नाही. मात्र, आर्थिक विवंचनेतुन ही आत्महत्या घडली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

अतुल शिंदे विविध प्रकारचे ओळखपत्र छपाई करण्याचे काम करीत होते. मात्र, लॉकडाऊनमध्ये शाळा, महाविद्यालये बंद असल्याने व व्यावसाय बंद असल्यामुळे आर्थिक विवंचना निर्माण झाली, त्यातुनच शिंदे कुटुंबाने आत्महत्या केली, अशी चर्चा सुरु आह

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Certificates: केंद्राकडून CAAची प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; कोणाला मिळालं पहिलं प्रमाणपत्र? जाणून घ्या

Nashik Modi Rally: "मोदीजी आता कांद्यावर बोला" मोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?

PVR Inox: T20 विश्वचषकासाठी पीव्हीआर आयनॉक्सचा मोठा प्लॅन; चित्रपटांनी निराश केल्यावर घेतला 'हा' निर्णय

PM Modi Nashik: नाशिकमध्ये पंतप्रधान अखेर कांद्यावर बोललेच; ऑपेरेशन ग्रीन, निर्यात बंदी आणि बफर स्टॉकबाबत म्हणाले...

Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत मेट्रो बंद; सुरक्षेचे कारण देत घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT