चिंचणी (ता. शिरूर) - घोड धरणात आजअखेर जमा झालेला पाणीसाठा.
चिंचणी (ता. शिरूर) - घोड धरणात आजअखेर जमा झालेला पाणीसाठा. 
पुणे

घोड धरणात २० टक्के पाणीसाठा

सकाळवृत्तसेवा

न्हावरे - कुकडी धरण साखळीतील वडज धरणाचा विसर्ग व पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे शिरूर तालुक्‍यातील चिंचणी येथील घोड धरणात आजअखेर २० टक्के पाणीसाठा जमा झाल्याची माहिती कनिष्ठ अभियंता के. एस. तळपे यांनी दिली.

यामुळे लाभधारक क्षेत्रातील जलाशयावर अवलंबून असणाऱ्या विविध गावांच्या पाणीपुरवठा योजना पुन्हा कार्यान्वित झाल्या आहेतच; शिवाय लाभक्षेत्रातील वीस हजार हेक्‍टर क्षेत्राला या पाण्याचा फायदा होणार आहे.

त्यामुळे लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी पाण्याच्या आवर्तनाचे व्यवस्थित नियोजन न केल्यामुळे चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणातील उपयुक्त पाणीसाठा यंदा तीन महिन्यांपूर्वीच संपला आहे.

तेव्हापासून लाभक्षेत्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाळा सुरू होऊन एक-दीड महिना उलटला तरीही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही लाभक्षेत्रात पावसाला सुरवात झाली नव्हती. त्यामुळे घोड धरणातील मृत साठ्यातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत होता. त्याची झळ त्यावरती अवलंबून असणाऱ्या अनेक गावांच्या पाणीपुरवठा तसेच योजनांना बसली होती. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची त्याचबरोबर जनावरांचीही पिण्याची पाण्याची ससेहोलपट होत होती. एकूणच लाभक्षेत्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, मागील आठवड्यापासून कुकडी प्रकल्पातील धरणक्षेत्रात कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे वडज धरणातील पाणीसाठा समाधानकारक झाला असल्यामुळे त्यामधील पाणी त्याचबरोबर भीमाशंकर खोऱ्यात पडत असलेल्या पावसाचे पाणी दोन दिवसांपासून नदीपात्राद्वारे घोड धरणात येत आहे. त्यामुळे जलाशयात आजअखेर १२०० एमसीएफटी पाणीसाठा जमा झाला आहे.

पाणीपुरवठा योजना सुरू झाल्या 
घोड धरणाच्या पाण्यावर श्रीगोंदा-शिरूर तालुक्‍यातील सुमारे वीस हजार हेक्‍टर जमीन ओलिताखाली येते. त्याचबरोबर रांजणगाव गणपती पंचतारांकित वसाहत तसेच शिरूर तालुक्‍यातील न्हावरे, निर्वी, कारेगाव, रांजणगाव गणपती, ढोकसांगवी, तर्डोबाचीवाडी, गोलेगाव, निमोणे, करडे, शिदोंडी आदी गावातील नागरिकांना घोड जलाशयातून पाणीपुरवठा होतो आलेल्या पाण्यामुळे लाभधारक क्षेत्रातील विविध गावांच्या पाणीपुरवठा योजना सुरू झाल्या असून, शेतीच्या पाण्याचा प्रश्नही लवकरच मिटण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT