Govindrao Talwalkar
Govindrao Talwalkar sakal
पुणे

गोविंदराव तळवलकर यांनी ज्यांच्यावर प्रहार केले ते अजूनही तळमळत आहेत ; कुलकर्णी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘पोटतिडकीने लिहिणे, शब्दांचे औडंबर माजून लिहिणे आणि लोकांना समजावे म्हणून लिहिणे हे लिखाणाचे तीन भाग आहेत. मात्र हे करीत असताना कोणताही आव न आणता शांतपणे लिहणारे संपादक म्हणजे गोविंदराव तळवलकर. खोटेपणा किंवा सामाजाच्या विरुद्ध केलेले काम त्यांना आवडायचे नाहीत. त्यावेळी त्यांनी ज्यांच्यावर प्रकार केले ते अजूनही तळमळत आहेत,’’ असे मत ज्येष्ठ पत्रकार डॉ. एस. के. कुलकर्णी यांनी सोमवारी (ता. २१) व्यक्त केले.

ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवलकर यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त ‘साहित्य शिवार वार्षिक पुणे’ यांच्यावतीने ‘गोविंदराव तळवलकर यांचे अग्रलेख’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यात डॉ. कुलकर्णी बोलत होते. निवृत्त आयएएस आणि बडोदा येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, ‘महाराष्ट्र टार्इम्स’चे मुख्य संपादक पराग करंदीकर, माजी महापौर अंकुश काकडे आणि ‘साहित्य शिवार’चे संपादक जयराम देसाई यावेळी उपस्थित होते.

तळवलकर यांच्याबरोबर झालेल्या ओळखीपासून त्यांच्या शेवटापर्यंतच्या आठवणी आणि त्यांचे लेखन याबाबतच्या आठवणींना यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी उजाळा दिला. डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘‘एखाद्या मुद्द्याचे विश्लेषण कसे करायचे हे तळवलकरांना चांगले माहिती होते. ज्यांना भारत, येथील व्यक्तिमत्त्व, कोणात काय कमतरता होती हे सर्व समजून घ्यायचे असेल तर त्यांनी गोविंदरावांचे अग्रलेख, मृत्युलेख आणि लेख चाळावे. दुसऱ्यांचा मोठेपणा त्यांनी निर्विवादपणे मांडला. केवळ साधना हाताशी असून चालत नाही कर्तृत्व देखील मोठे असावे लागते. ते गोविंदरावांकडे होते.’’ ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. ना. भि. ऊर्फ नानासाहेब परुळेकर यांच्याबरोबर काम करतानाचे अनुभव देखील यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी मांडले.

देशमुख म्हणाले, ‘‘१९७० पासून माझी गोविंदरावांच्या लेखणीशी मैत्री आहे. २००५ साली माझी त्यांच्याशी पहिली व शेवटची भेट झाली. मी खूप वाचतो हा माझा भ्रम त्यांना भेटून दूर झाला. उदारमतवादी, परखड शैली आणि नेमकं शीर्षक त्यांच्या लेखनात असायचे. गो हत्या बंद करण्यासाठी ते पेटून उठले होते. आजही आपण शेती सुधारणेस हात घालतो आणि आपली फसगत होते. त्यामागील आपली भूमिका तळवलकर यांनी अत्यंत योग्यपणे मांडली होती.’’ त्यांच्या भविष्यवादी लेखांची माहिती यावेळी देशमुख यांनी दिली. करंदीकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. देसाई यांनी प्रास्ताविक करीत कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. आभार काकडे यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT