Jayant Patil 
पुणे

चंद्रकांत पाटील काहीही बोलतात; जयंत पाटील यांचा टोला

सकाळ डिजिटल टीम

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून जयंत पाटील 4 दिवस सांगलीला थांबले तर पुण्याचे पालकमंत्री असूनही अजित पवार आठवड्यातून एक दिवस भेट देतात असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. याला प्रत्यूतर देताना जंयत पाटील म्हणाले, ''अजित पवारांवर संपूर्ण राज्याची जबाबदारी पूर्णपणे आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनास्थितीवर निंयत्रण ठेवण्याचे काम ते करत आहेत. पुण्यावरही त्यांचे पूर्ण लक्ष \आहे. येथे अगदी छोटा प्रश्न असेल तरी तो सोडविण्यासाठी उपस्थित असतात. अनेकवेळा पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये येऊन बैठका घेऊन प्रश्न सोडवत असतात. चंद्रकात पाटील काहीतरी बोलायचे म्हणून बोलत असतात असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

चंद्रकांत पाटलांच्या टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, ''चंद्रकांत पाटलांनाच माहित नाही की त्यांच्या पक्षाचे लोक किती मला येऊन भेटले? ते त्यांच्या लोकप्रतिनिंधींना भेटले'' याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, की ''कोल्हापुरचे चंद्रकांत पाटील पुण्यात येऊन उभे राहिले, त्यांना पुण्यातील जनतेने निवडून दिलेले आहे. त्यामुळे पुण्यासाठी मी काहीतरी करतोय हे सांगण्याचा जर ते प्रयत्न करत असतील आणि त्याच्यासाठी अजित पवारांवर टीका करत असतील. तसं असेल तर त्याकडे पुणेकरांनी लक्ष देण्याची आवश्यकता नाही.''

''अजित पवार किती झपाट्याने काम करतात, किती वेगाने काम करतात, कशा पद्धतीने काम करतात हे महाराष्ट्राला माहिती आहे असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

महाविकास आघाडी सरकार लसीकरणाचे श्रेय घेत आहे, केंद्राची प्रतिमा जनतेच्या मनातून उतरवली जाते असा प्रश्न प्रविण दरेकरांनी उपस्थित केला आहे. त्याबाबत उत्तर देताना, जंयत पाटील म्हणाले, ''जनेतेची बाजू घेऊन स्थानिक सरकार बोलत असेल तर हा श्रेयवाद नाही. केंद्र सरकारकडून ऑक्सिजन वाटप होते, केंद्र सराकारकडून रेमेडेसिव्हिर वाटप होते. पण केंद्र सरकार महाराष्ट्राला कमी प्रमाणात लस देत आहे. लोकसंख्येच्या महाराष्ट्रात प्रमाणात लस द्या. जेवढ्या प्रमाणात कोरोना महाराष्ट्रात पसरला आहे त्या प्रमाणात रेमडेसिव्हिर द्या. लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त आहे. त्या तुलनेने महाराष्ट्रापेक्षा जास्त रेमेडिसिव्हीर ज्या राज्यात गेलेत त्या राज्याबद्दल लोकही प्रश्न विचारतात. एवढाच त्याचा भाग आहे. दरकेरांनी वाईट वाटून घेऊ नये.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Decision about World Cup: भारत विश्वविजेता झाल्याच्या पाच दिवसांतच ‘ICC’ने विश्वचषकाबाबत घेतला मोठा निर्णय!

India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

MahaBiz Summit : राज्यातील उद्योजकांना मिळणार जागतिक संधींचे व्यासपीठ ‘जीएमबीएफ’ व ‘एमईडीसी’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत ‘महाबिझ’चे आयोजन

Mahar Vatan Land Scam : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारानंतर खळबळ; 'महार वतन जमिनी बळकावणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा' महार वतन परिषदेची मागणी

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT