Marriage 
पुणे

आधी वकिलाची भेट, मग लग्नाची गाठ!

सुनील गाडेकर

पुणे - साखरपुडा ही लग्नाची पहिली पायरी. नंतर मुलगा आणि मुलीमध्ये संवाद वाढतो. त्यातून एकमेकांचा स्वभाव समजायला लागतो. परस्परांच्या अपेक्षाही लक्षात येतात. मात्र या संवादात प्रेमाच्या शब्दांपेक्षा अपेक्षाच जास्त असतील, तर लग्न करावे की नाही, हा प्रश्‍न उभा ठाकतो. पर्यायाने कायदेशीर सल्ल्यासाठी मग तो किंवा ती वकिलांचा दरवाजा ठोठावते. 

प्रेम संबंधातून जमलेल्या लग्नात एकमेकांचे स्वभाव व मागण्या दोघांनाही बऱ्यापैकी माहीत असतात. मात्र कुटुंबीयांनी ठरवलेल्या लग्नातील मुला-मुलीचे पुरेसे बोलणे झालेले नसते. साखरपुड्यानंतरच संवाद वाढतो. तेव्हा आवड-निवड समजल्यानंतर चर्चा आशा-अपेक्षांकडे जाते. एकमेकांची पसंती न जुळल्याने ब-याचदा त्यांचा काही आक्षेप नसतो. पण इच्छा-अपेक्षांमध्ये जुळवून घेतले नाही तर त्यांच्यात नाराजी व रुसवेफुगवे सुरू होतात. लग्नाच्या अटी पटल्या नाहीत तर पुढे जायचे की नाही, याबाबत गोंधळ होतो. कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतरही मार्ग निघत नसेल तर थेट वकिलांची गाठ घेतली जात आहे.  लग्न जमल्यानंतर काही दिवस लिव्ह-इनमध्ये राहू. अन्यथा वेगळे होऊ, असा प्रस्ताव ठेवला जातो. समजून घेतले तर ते लग्नापर्यंत पोचतात.

मुलींच्या मागण्या
    काही पगार माहेरी देणार
    नोकरीची संधी मिळाली तर परदेशी जाणार
    वैचारिक व आर्थिक स्वातंत्र्य हवे

मुलांच्या मागण्या
    आई-वडील बरोबरच राहतील
    तुझा पगार फक्त आपल्या कुटुंबासाठी वापरायचा
    तुझ्या आई-वडिलांचे आपल्या कुटुंबात लक्ष नको

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nipah Virus Alert : सावधान! पश्चिम बंगालमध्ये आढळले ‘निपाह’ विषाणूचे रूग्ण; केंद्र सरकारकडून हालचालींना वेग

Pune News : सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचा एल्गार; बिनविरोध निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले!

Bhogi Horoscope : भोगीनंतर 'या' 5 राशींचे भाग्य बदलणार; अचानक मिळतील पैसे, रखडलेली कामे पूर्ण होणार अन् ऑफिसमधून मिळेल खुशखबर

PMC Abhay Yojana : पुणेकरांनो घाई करा! अभय योजनेचे शेवटचे ७२ तास शिल्लक; ७५ टक्के सवलत गमावू नका!

Vande Bharat Sleeper Train: प्रतीक्षा संपली! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ शनिवारपासून धावणार

SCROLL FOR NEXT