Untitled-1.jpg
Untitled-1.jpg 
पुणे

पुणे : बिबट्याच्या धसक्याने नारोडीकरांची उडाली झाेप ! 

सकाळ वृत्तसेवा

घोडेगाव : नारोडी (ता. आंबेगाव) येथील ग्रामस्थांनी आता बिबट्याचा धसका घेतला आहे. 10 वर्षापूर्वी या गावात सर्पदंशाने हाहाकार उडाला होता. त्यावेळी 10 ते 12 जण सर्पदंशाने मृत्युमुखी पडले होते. त्यात 5 ते 6 शालेय विद्यार्थ्यांचा समावेश होता. जागरूकता राखून यावर एकजुटीने ग्रामस्थांनी मात केली. पण आता नारोडी परिसरात होणारे बिबट्याचे हल्ले पाहून पुन्हा एकदा मोठे संकट उभे राहते की काय, अशी चर्चा गावात सुरू आहे. 

नारोडी हे गाव घोडनदी काठावर आहे. या गावाची लोकसंख्या अंदाजे चार हजारावर आहे. संपूर्ण बागायत क्षेत्र असणाऱ्या गावात ऊस, केळी व भाजीपाला ही प्रमुख पिके आहेत. येथील नदीला बारा महिने पाणी असते. त्यामुळे गेल्या 10 वर्षात येथे उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. हमखास उत्पन्न देणारे ऊस पीक असल्याने त्यात वाढ होत आहे.

सध्या बिबट्याचे उसाची शेती हेच वास्तव्याचे ठिकाण बनले आहे. नारोडी परिसरात असणाऱ्या आठ वाड्या-वस्त्यांवर बिबट्याचे रोज दर्शन होत आहे. सध्या परिसरात बछडेही दिसत आहेत. परिसरातील बरीच पाळीव कुत्री बिबट्याने फस्त केली आहेत. अनेक ठिकाणी शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला आहे. बिबट्या सध्या ग्रामस्थांवर हल्ला करू लागला आहे. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

गेल्या वर्षभरात गावातील 6 लोकांवर हल्ले झाले आहेत. ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी दिवसाही लोक घाबरत आहेत. शेती कशी करावी असा प्रश्न तयार झाला आहे. नारोडी गावात सर्पदंशानंतर बिबट्याचे हल्ले ही एक मोठी समस्या उभी राहिली आहे. वनकायद्याचा विचार केल्यास माणसांना जास्त अधिकार नाहीत. पुन्हा एकदा एकसंघ होऊन जागृती करून यावर मात करण्याची गरज आहे.

एखादी मोठी घटना होण्याअगोदरच सावध राहिले पाहिजे. याबाबत सोपान घोडेकर म्हणाले, ""गावात बिबट्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. क्षेत्रफळाप्रमाणे येथे प्रमाणापेक्षा जास्त बिबटे आहेत. शेती करायची की नाही हा प्रश्‍न तयार झाला आहे. वन खात्याने तातडीने याची दखल घ्यावी.'' 

निसर्गात सर्वांना जगण्याचा अधिकार आहे. झालेल्या घटनेच्या ठिकाणी पिंजरे लावले जातात. परंतु बिबट्या पिंजऱ्यात येत नाही. त्यातही बछडे असतील तर खूप काळजी घ्यावी लागते. रेस्क्‍यू टीमद्वारे जनजागृती व गावात फेरी मारली जाते. ग्रामस्थांनी एकत्र राहून यावर मात करावी. बिबटे लवकरच जेरबंद केले जातील. - वाय. एस. महाजन, वनपरिक्षेत्र अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT