बारामती - सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार. 
पुणे

Loksabha 2019 : भाजपमुळे देश अस्थिर - शरद पवार

सकाळवृत्तसेवा

बारामती - ‘भाजप सरकारने पाच वर्षांत अनेक चुकीचे निर्णय घेऊन अस्थैर्य निर्माण करण्याचे काम केले. या देशाला आता स्थिर सरकारची आणि स्थैर्याची गरज आहे. नागरिकांमधील अस्वस्थता दूर करण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी जनतेने उभे राहावे,’’ असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता सभा रविवारी (ता. २१) बारामतीत झाली, त्याप्रसंगी पवार बोलत होते.

याप्रसंगी पवार यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले, ‘‘राज्यातील प्रश्नांबाबत, तसेच विकासाच्या मुद्द्यांबाबत न बोलता केवळ पवार आणि गांधी कुटुंबावर टीका करणे इतकेच काम या दोघांनी केले. आमच्या काळातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या; मात्र गेल्या पाच वर्षांत ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ही परिस्थिती बदलायची असेल, तर कर्जमुक्तीची गरज आहे. ही कर्जमुक्ती काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार देईल.’’

‘एकीकडे बड्या उद्योजकांची कर्जमाफी करणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत का?’’ असा सवाल करत पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली. ‘‘माझे बोट धरून राजकारणात आले, असे मोदी सांगत आहेत आणि दुसरीकडे ते बेधडकपणे खोटे बोलतात. मला तर आता याची भीतीच वाटू लागली आहे. आता मी डॉक्‍टरांकडे जाऊन माझ्या बोटाचीच तपासणी एकदा करून घेणार आहे,’’ अशी मिस्कील टिप्पणी पवार यांनी या वेळी केली. 

अमित शहा यांनी बारामतीत येऊन पवार यांच्यावर केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

Vadhavan Highway Project : वाढवण महामार्गाचे केवळ 16 टक्केच काम पूर्ण; जमीन संपादनात नेमके अडथळे काय? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Raj Thackeray Speech in Pune : 'महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते?'; पुण्यातील भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?

Jalgaon Temperature : उष्णतेचा कहर; तापमान ४३.८ अंशांवर, उकाड्याने बदलला दिनक्रम, ‘डिहायड्रेशन’च्या रुग्णांमध्‍ये वाढ

Parli Vaijnath News : परळीत दर सोमवारी मांस विक्रीला बंदी; पालिकेने घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT