Sharad Pawar  esakal
पुणे

Sharad Pawar : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती उत्तम राहावी

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती उत्तम राहावी असे आम्हा लोकांना वाटते, त्यांनी उपोषणाचा मार्ग सोडून प्रश्न सोडविण्यासाठी विचारविनिमयाचा मार्ग शक्य आहे का हे जरुर पाहावे.

मिलिंद संगई

बारामती - मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती उत्तम राहावी असे आम्हा लोकांना वाटते, त्यांनी उपोषणाचा मार्ग सोडून प्रश्न सोडविण्यासाठी विचारविनिमयाचा मार्ग शक्य आहे का हे जरुर पाहावे, लोकांची सहानुभूती त्यांना आहे, प्रश्न सुटावा असे लोकांनाही वाटते, त्या साठी राज्य सरकारनेही समंजसपणाची भूमिका घ्यावी, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

बारामतीत माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी ही भूमिका बोलून दाखविली. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार विशेष अधिवेशनात नेमका काय प्रस्ताव आणणार आहे हे स्पष्ट झाल्याशिवाय या बाबत बोलण्यास पवार यांनी नकार दिला.

लोकसभेला यश नाही आले तर विधानसभेला निवडणूक लढविणार नाही असे अजित पवार म्हणाले, या बाबत विचारता शरद पवार म्हणाले, हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे, भावनात्मक अपील आमच्याकडून करण्याचे काही कारण नाही, बारामती मतदारसंघातील लोक आम्हाला वर्षानुवर्षे ओळखतात, पण ज्या पध्दतीने विरोधकांकडून भूमिका मांडली जाते, त्यांची भाषणे काहीतरी वेगळच सुचवत आहेत, त्याची नोंद बारामतीचा मतदार निश्चित घेईल व योग्य तो निर्णय घेईल.

पवार कुटुंबात मी एकटा आहे असे अजित पवार सांगत असतील तर लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न दिसतो, असेही त्यांनी सांगितले. शरद पवार गटाकडे जाणा-या कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, काही कार्यकर्त्यांनी या बाबत फोन येतात, दमदाटी केली जाते, बारामतीत ज्या गोष्टी कधीच नव्हत्या त्या पहिल्यांदाच यंदा पाहायला मिळत आहेत.

जितेंद्र आव्हाडांनी दोन्ही पवारांमध्ये भांडणे लावली या धनंजय मुंडे यांच्या आरोपाचे शरद पवारांनी खंडन केले. ते म्हणाले, धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत जितका काळ घालवला त्याहून अधिक काळ आव्हाड पक्षासाठी कार्यरत आहेत, त्यांनी राष्ट्रीय व राज्य पातळीवर काम केले आहे. पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे, त्यांनी वेगळी भूमिका घेतली अस नाही, जितेंद्र आव्हाडांनी काय बोलाव हे अन्य लोकांनी सांगण्याची आवश्यकता नाही.

सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे यांच्यातील संभाव्य लढतीबाबत बोलताना पवार म्हणाले, लोकशाहीत निवडणूक लढविण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, या बाबत तक्रार करायचे कारण नाही, आम्ही आमची भूमिका लोकांसमोर मांडू. गेली पन्नास वर्षे आम्ही काय काम केले हे लोकांना माहिती आहे, विद्या प्रतिष्ठान किंवा कृषी विकास प्रतिष्ठान केव्हा स्थापन झाली, आज आरोप करणारे त्या वेळी काय वयाचे होते, निवडणूकीला उभे राहण्याचा त्यांना अधिकार आहे.

अलिकडच्या काळात काही यंत्रणा महत्वाच्या बनल्या आहेत, या संस्था प्रभावीपणे विरोधकांवर कशा कारवाया करतात हे हल्ली पाहायला मिळते, जे लोक पक्षांतर करत आहेत त्याची कारणे या संस्थांशी जोडली असल्याचे अशोक चव्हाणांच्या भाजपप्रवेशाबाबत बोलताना त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Success Story: गटविकास अधिकाऱ्यांची एमपीएससीत यशस्वी झेप; सोनल शहांची जीएसटी असिस्टंट कमिशनरपदी निवड, नाेकरी करत यशाला गवसणी!

Asaduddin Owaisi : मुस्लिमांनी नेतृत्व निर्माण करावे

IND vs NZ 1st ODI : विराट कोहली प्रेक्षकांवर भडकला! Rohit Sharma बाद झाल्यावर जे घडलं, ते अपेक्षित नाही; त्याला कसला राग आला?

Prajakt Tanpure:सत्ताधाऱ्यांचे हिंदुत्व बेगडी: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे; पोलिस निरीक्षक पुजारी यांच्यावर कारवाई करा !

Dog Attack : फुरसुंगीत भटक्या श्वानाचा एकवीस जणांना चावा

SCROLL FOR NEXT