एस. एम. जोशी सभागृह - असगर वजाहत (डावीकडील) यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखक आणि दिग्दर्शक सागर सरहदी यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. 
पुणे

तंत्रज्ञानामुळे चित्रपटांना प्रतिसाद नाही - सागर सरहदी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘लेखनाची आवड मला पहिल्यापासून होती. विविध नाटकांसाठी मी लिखाण केले; परंतु आर्थिक स्थितीमुळे चित्रपटांसाठी काम करावे लागले. आज मोबाईलसारख्या माध्यमामुळे चित्रपटांनादेखील किंमत राहिली नाही,’’ असे मत ज्येष्ठ लेखक आणि दिग्दर्शक सागर सरहदी यांनी व्यक्त केले.

इंटरनॅशनल कल्चरल आर्टीफॅक्‍ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये रविवारी (ता. २९) सागर सरहदी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ज्येष्ठ लेखक असगर वजाहत यांच्या हस्ते देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. 

सरहदी म्हणाले, ‘‘चित्रपटांसाठी काम करण्यात मला पहिल्यापासूनच रुची नव्हती; परंतु त्या काळात चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद असायचा. या क्षेत्रात पैसेसुद्धा चांगले मिळायचे. तेव्हा मी ‘कभी कभी’, ‘सिलसिला’, ‘चांदनी’, ‘कहो ना प्यार है’सारख्या चित्रपटांचे लेखन केले. मला नाटकाचे लिखाण करायचे होते. म्हणून नाटकांसोबत चित्रपटांसाठी लिखाण सुरू ठेवले. सध्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे चित्रपटांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. कित्येक चित्रपट फ्लॉप झाले. माझाही एक चित्रपट विकला गेला नाही. याची मला खंत आहे.’’ चित्रपट निर्माते नीलेश नवलखा, लेखक अविनाश दास, उषा देशपांडे, मोहन दास, अमनदीप सिंग आदी या वेळी उपस्थित होते. वजाहत म्हणाले, ‘‘सागर सरहदी सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या नव्या पिढीतील चित्रपट लेखक आणि दिग्दर्शकांनी प्रेक्षकांना आवडेल असे चित्रपट निर्माण करावेत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT