Amol Kolhe
Amol Kolhe 
पुणे

'संभाजी' बंद करण्यासाठी याचिका केल्याने खरा चेहरा समोर: अमोल कोल्हे 

विलास काटे

आळंदी : पुणे-नाशिक आणि पुणे-नगर महामार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी हे नागरिकांसाठी दुर्दैव आहे. आजपर्यंत विमानतळ आणि महामार्गाचा प्रश्न प्रभावी मांडला नाही. बैलगाडा शर्यत इथली संस्कृतीच नाही तर ग्रामिण भागाची आर्थिक नाळ असल्याने शिरूर लोकसभा मतदार संघात पंधरा वर्षात झाले नाही ते आता पाच वर्षांत पूर्ण करणार हे माझे जनतेसाठीचे कमिटमेंट असल्याचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी वाकी (ता. खेड) येथील पत्रकार परिषदेत सांगितले.

शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रसे पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शनिवारी (ता. २३) रात्री वाकी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, माजी आमदार दिलिप मोहिते, देवदत्त निकम यांची उपस्थिती होती.

मतदार संघातील समस्या आणि विकासाबाबत बोलताना डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले की, पुणे-नगर आणि पुणे-नाशिक महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असून अनेकदा लोकप्रतिनिधींनाही सामना करावा लागला हे दुर्दैव आहे. पुणे-नाशिक रेल्वेचा प्रश्न दिंडोरीचे खासदार विचारतात मग इथले खासदार गप्प का यांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला पाहिजे. संसदेत किती प्रश्न विचारले यापेक्षा किती सोडविले हे महत्वाचे. साडे आठ कोटींचा निधी परत गेला. मग आता मतदारसंघातले प्रश्न संपले का हे विचारण्याची वेळ आली आहे.

राष्ट्रीय राजकारणात विधायक दिशा देण्यासाठी तरूणाची गरज आहे. भावनिक मुद्यांची नाही. शिरूर लोकसभा मतदार संघातच नाही तर जिल्ह्यात किल्ल्यांकडे पर्यटन या नजरेतून विकास आवश्यक आहे. तुळापूर, वढू येथे शंभूसृष्टी तर देहू आळंदीसारख्या तिर्थक्षेत्रात संत सृष्टी झाली तर पर्यटन वाढेल आणि स्थानिकांचा आर्थिक विकासस्तर उंचावेल. यासाठी शिरूर लोकसभा मतदार संघ केवळ औद्योगिक नाही तर पर्यटनाच्या दृष्ट्रीने भक्ती शक्ती टुरिझम कॅरिडॉर इंडस्ट्री म्हणून ओळख होण्याच्या दृष्ट्रीने प्रयत्न झाला पाहिजे. शिवनेरीवर रोप वे झाला पाहिजे. मतदारसंघात शेती उत्पन्न मोठे असल्याने अनेकदा भाव नसल्याच्या कारणाने उत्पादित माल फेकून दिला जातो. शेतक-याचे नुकसान होवू नये यासाठी शेत मालावर प्रक्रिया करणारा उद्योग स्थानिक पातळीवर हवा. जंगली आणि वन्य भागातील औषध वनस्पतींचा विचार झाला पाहिजे. ग्रामिण रूग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची उणीव शिरूर मतदार संघात प्रकर्षाने जाणवत आहे. पंधरा वर्षात फक्त समस्या आणि समस्याच जाणवल्या.

स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका निवडणूक काळात बंद करण्यासाठी याचिका दाखल केल्याने खरा चेहरा जनतेसमोर आला. त्यांचा बेगडी बुरखा आज टरा टरा फाडला. मत मागायचा हक्क समोरच्यांनी गमावला. महाराजांचा खरा इतिहास १२८ देशात पाहिला जात आहे. कदाचित सेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरेंना याबाबत अद्याप माहित नसेल. हे पाप जो करत असेल तर जनता त्यांना माफ करणार नाही. खासदार म्हणून निवडून आल्यावर मालिका संपल्यावर पुन्हा मालिका विश्वाला राम राम करून मतदार संघाच्या विकासासाठीच कटिबद्द राहिल असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

Aye Haye Oye Hoye Viral Song: जे गाणं ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी कानावर ठेवले हात, त्याचं ओरिजनल व्हर्जन आहे भन्नाट

Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

SCROLL FOR NEXT