tanishka
tanishka 
पुणे

देशाची बाजारपेठ ‘तनिष्का’ जिंकू शकतात!

सकाळ वृत्तसेवा

पुणे-  ‘‘नव्या कल्पना योग्यरीत्या राबवल्या, तर तुमच्या उत्पादनाला मागणीच मागणी येऊ शकते, त्यामुळे तुम्ही महिला देशाची बाजारपेठ जिंकू शकता,’’ अशा शब्दांत मार्केटिंग क्षेत्रातील तज्ज्ञ, रूरल रिलेशन्सचे प्रमुख प्रदीप लोखंडे यांनी ‘तनिष्कां’ना प्रेरणा दिली.

लोखंडे यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी विविध विषयांवर बुधवारी तनिष्का सदस्यांना मार्गदर्शन केले. निमित्त होते ‘तनिष्का संवाद २०१९’चे. माहिती आणि मनोरंजनावर आधारित दिवसभराचे संमेलन उत्साहात पार पडले. या वेळी ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सीईओ उदय जाधव, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे विभागीय अधिकारी सुशील जाधव, सोहम उद्योगचे प्रमुख विनय गरगटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्‌घाटन झाले. त्यापूर्वी मैत्रयी निर्गुण आणि समृद्धी पुजारी यांनी नृत्यातून गणेशवंदना सादर केली. तनिष्कांना देशी झाडांच्या १२ लाख बिया मोफत पुरवल्याबद्दल वृक्षमित्र महेंद्र घागरे यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी अभिजित पवार म्हणाले, ‘‘तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून राज्यातील महिलांनी एकत्र येऊन अनेक प्रकल्प राबविले आहेत. या कामांतून यशोगाथा निर्माण झाल्याने समाजाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. महिलांच्या क्षमता- व्यक्तिमत्त्व विकासासाठी तनिष्कांतर्गत उपक्रम- प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांमध्ये प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता निर्माण व्हावी, यासाठी इस्राईलला अवघड परीक्षा घेतात. अपयशानंतर खूप अभ्यासाने परीक्षेत यश मिळते. तेथे हे अपयश साजरे केले जाते. अपयशानंतर यशाकडे जाण्याचे लक्षात ठेवले पाहिले.’’ समाजात, व्यवसायात वेगळे करू बघणाऱ्या तनिष्कांना ‘मजेत जगावं कसं?’ या विषयावर लेखक शिवराज गोर्ले यांनी  मार्गदर्शन केले. 

पर्यावरण आणि स्त्रिया-मुले याविषयी उद्योजिका चित्रलेखा वैद्य म्हणाल्या, ‘‘विषारी कीटकनाशके फवारली जात आहेत, त्यामुळे भाज्या, धान्यासह जमीन, पाणी सर्वच विषारी होत आहे. त्याचे परिणाम आरोग्यावर होतात. महिलांनी प्लॅस्टिकमुक्त पॅकेजिंग, पर्यावरणपूरक सेंद्रिय वस्तू, सौंदर्यप्रसाधने यांसारखे व्यवसाय सुरू करावेत.’’ महिलांमध्ये प्रचंड आंतरिक शक्ती असते. नकारात्मक विचार कराल, तर तसेच होणार. अंधश्रद्धा बाळगू नका, सकारात्मक विचार करा, असे वास्तुशास्त्रातील तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी सांगितले. मनाची ताकद वाढवण्याच्या प्रात्यक्षिकाला तनिष्कांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमासाठी पुणे, सातारा जिल्ह्यातील तनिष्का सदस्या उपस्थित होत्या. फुलांच्या रांगोळ्या, सोनचाफ्याच्या फुलांची भेट, सनई- सरोदच्या सुरावटीत तनिष्कांचे स्वागत केले. कृष्णा पर्लतर्फे भेट म्हणून कूपन देण्यात आली. या कार्यक्रमासाठी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि सोहम उद्योग यांचे प्रायोजकत्व होते. पल्लवी चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT