ST bus 
पुणे

पुणे: नारायणगावजवळ एसटीला अपघात; 9 जणांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे-नाशिक महामार्गावर एसटी आणि टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून, 10 जण जखमी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (सोमवार) पहाटे दीडच्या सुमारास हा अपघात झाला आहे. त्र्यंबकेश्वरहून पुण्याकडे निघालेल्या बसने (MH 14 BT 4351) नादुरुस्त टेम्पोने (MH 17 T 4299) समोरून धडक दिल्याने हा अपघात झाला. एसटीचा अर्धाभाग पूर्णपणे उखडला आहे. रविवारी रात्री 9 वाजता ही बस त्र्यंबकेश्वरहून निघाली होती. नारायणगावजवळ बस आली असताना हा अपघात झाला. बसमधील 27 प्रवाशांपैकी 7 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन टेम्पो चालकांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात 10 7 जण जखमी झाले असून, त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मृतांमध्ये किशोर जोंधळे, रशीद पठाण (टेम्पो चालक, रा. कोकणगाव, ता. संगमनेर), शोभा पवार, यमूना पगार, संकेत मिस्त्री, विकास गुजराथी, सागर चौधरी व दोन आनोळखी स्त्री व पुरूषाचा समावेश आहे. संजीव भावसार, दिपक लांडगे, नंदू पगार, संतोष गुलदगड, सूर्यकांत घाडगे, रमेश शेळके, ज्ञानेश्वरी शेळके, गणेश धोंगडे, सखूबाई शिवमंत, तुकाराम पवार हे जखमी झाले आहेत. नारायणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक व्ही. ए. वाघमारे अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Pune Heavy Rain: सहा तालुक्यांत अतिवृष्टी; १७ धरणांतून पाणी सोडले, दौंडमध्ये ढगफुटी

Ujani Dam:'भीमा नदीला तीन महिन्यांत तिसऱ्यांदा पूर'; उजनीतून पाच वर्षांनंतर यंदा सोडले १५२ टीएमसी पाणी, ९० हजार क्युसेकचा विसर्ग

SCROLL FOR NEXT