पुणे

दूध ओतू नका, भाज्या फेकू नका - शरद पवार

सकाळवृत्तसेवा

पुणे - शेतकऱ्यांच्या तीव्र भावना मी समजू शकतो. मात्र, रस्त्यावर दूध ओतून देणे, भाजीपाला, फळे फेकून देऊन वाया घालवू नका. त्यापेक्षा गोरगरिबांना वाटप करा,’’ असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शेतकऱ्यांना केले आहे. 

गोरगरिबांना वाटप केल्यास गावातील सामान्य लोकांसोबत आपली नाळ घट्ट होईल. शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे संप नक्की यशस्वी होईल, अशी मला खात्री असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे. निवडणुकीपूर्वी भाजपने शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे शेतीमालाला किंमत देण्याचे आश्‍वासन दिले होते; पण निवडणुकीनंतर शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखविण्यात आल्या. त्या आश्‍वासनांची अंमलबजावणी आणि मागण्यांची पूर्तता सरकारने तातडीने करावी, असेही त्यांनी नमूद केले.

अल्पकर्जधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबाबतचे संकेत देऊन राज्य सरकार संपामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे; पण शेतकरी बांधवांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू चहरला झाली गंभीर दुखापत, सामन्यानंतर कोचने केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT