Pune-Rains
Pune-Rains 
पुणे

#PuneRains संसार चिखलात फसलेलाच

सकाळ वृत्तसेवा

पुणे - गेल्या तीन दिवसांपासून घरातील चिखल बाहेर काढण्यासाठी नागरिक कष्ट घेत आहेत, पण अद्यापही त्यांना दिलासा मिळालेला नाही. जेवढे स्वच्छ करू, तेवढा चिखल निघत आहे. गाळामुळे घरात दुर्गंधी सुटत असल्याने आता रोगराई पसरण्याची भीती नागरिकांना वाटत आहे. त्यातच वीज आणि पाणी नसल्याने हालामध्ये आणखी भर पडली आहे.

बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने कात्रजपासून ते नवी पेठ या दरम्यान आंबिल ओढ्याच्या परिसरातील सोसायट्या, वस्त्या, झोपडपट्ट्यांना पुराच्या पाण्याचा दणका बसला. अनेक ठिकाणी सीमाभिंती पडल्याने सोसायट्यांच्या आवारात पाणी गेले. त्यामुळे पहिला मजला पूर्णपणे पाण्याखाली गेला, काही सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पाणी आहे, ते अद्याप निघालेले नाही. त्यामुळे शेकडो मोटारी, दुचाकींचे नुकसान झाले आहे. महापालिकेची यंत्रणा पाणी, आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी जुंपली आहे, पण रहिवाशांना शनिवारीही दिलासा मिळालेला नाही. 

अरण्येश्‍वर येथील टांगेवाला कॉलनीतील सोसायट्यांमध्ये चिखल असून, प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. तेथील रहिवाशांनी शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यानंतर आज येथे महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे.

जेसीबीच्या साह्याने येथील राडारोडा उचलून तो बाहेर घेऊन जात आहेत. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सुमारे दीडशे स्वयंसेवक या भागात फावडे, टोपले घेऊन गाळ काढून देण्यासाठी मदत करत आहेत. या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित केले आहे. ट्रेझर पार्क, अण्णा भाऊ साठे स्मारक येथील शोबा सांज सोसायटीच्या पार्किंगमध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणात पाणी आहे. दिवसरात्र मोटारी लावून पाण्याचा उपसा सुरू असला तरी हे काम संपलेले नाही. पार्किंगमधील पाणी व चिखल यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे.  गुरुराज सोसायटीमध्ये सुमारे ५० फ्लॅटमधील राडरोडा घरातून बाहेर काढला जात आहे.

घरातील गाद्या, अंथरूण, पांघरूण, कपडे, चादरी यांसह अनेक साहित्य खराब झाल्याने ते घराच्या बाहेर टाकले आहे. त्याच वेळी खराब झालेल्या गाड्या, टोइंग करून सर्व्हिस सेंटरला नेण्यासाठी रहिवाशांची धडपड सुरू आहे. केके मार्केट, भगली चौक,  इंदिरानगर या भागांतही नागरिकांचे जनजीवन सुरळीत झालेले नाही.

किती दिवस सुटी मिळणार? 
पुरामुळे गुरुवार, शुक्रवार दोन दिवस ऑफिस बुडाले आहे. त्यानंतर शनिवार, रविवारची सुटी लागून आली आहे. पण हे चार दिवस घर सावरण्यासाठी कमी पडत आहेत. घरातील चिखल बाहेर काढत आहोत, त्यात खराब झालेल्या वस्तू फेकून द्यायच्या की ठेवायच्या हेही कळत नाही. सोमवारी पुन्हा ऑफिस सुरू होतील. घर पुन्हा उभे करण्यासाठी सुट्टी किती दिवस मिळणार, हा प्रश्‍नही आमच्यासमोर उभा आहे, अशी भावना गुरुराज सोसायटीतील रहिवाशांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT