Sharad Pawar speaks at Vasantdada sugar institute program Pune 
पुणे

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशात अन्नधान्याची गरज वाढत असल्यामुळे उसाचे क्षेत्र वाढवणे शक्य नाही. परंतु त्याऐवजी उत्पादकता वाढविण्यावर भर द्यावा लागेल. त्यासाठी या उद्योगाशी संबंधित संशोधन संस्था आणि शेतकरी यांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. तसेच, केंद्र सरकारने संशोधनावर अधिक गुंतवणूक करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने शुक्रवारी (ता. 31) आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या परिषदेस इंग्लंड येथील आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे कार्यकारी संचालक डॉ. होजे आरिव्ह, पंजाबचे सहकारमंत्री सुखजिंदरसिंग रंधवा, राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, शंकरराव गडाख, सतेज पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे, इस्माचे अध्यक्ष विवेक पिट्टी आदी यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट राज्यातीलच नव्हे तर देशातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. साखर उद्योगाशी संबंधित संशोधन क्षेत्रात गुंतवणुकीचे प्रमाण खूप कमी आहे. भविष्यात साखर, इथेनॉल आणि विजेची गरज पाहता हीच परिस्थिती राहिल्यास साखर उद्योग ही आव्हाने पेलू शकणार नाही. त्यामुळे संशोधन क्षेत्रात अधिक गुंतवणूक होणे गरजेचे असून, शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. साखरेच्या बाजारातील चढ-उतार वातावरणातील बदल आणि कमी पाण्यामध्ये चांगले उत्पादन देणाऱ्या ऊसाच्या जातीचे संशोधन होण्याची गरज आहे साखर उद्योगाच्या वाढीसाठी सर्व घटकांनी एकत्रित येण्याची गरज आहे. महाराष्ट्रासह सर्व राज्यांना साखरेच्या निर्यातीवर भर द्यावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालय

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT