MPSC Sakal
पुणे

एमपीएससी परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ करण्याची ‘स्टुडंट्स राईट्स’ने केली मागणी

कोरोनामुळे महाराष्ट्र राज्य लोकसेवेच्या परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या आहेत. विद्यार्थ्यांनी तणावात परीक्षा दिल्याने त्याचा परिणाम निकालावर होण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनामुळे महाराष्ट्र राज्य लोकसेवेच्या परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या आहेत. विद्यार्थ्यांनी तणावात परीक्षा दिल्याने त्याचा परिणाम निकालावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय परीक्षेच्या धर्तीवर पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविण्याचे प्रमाण १ः१४ ऐवजी १ः२५ असे करावी, अशी मागणी अशी मागणी एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे महेश बडे आणि किरण निंभोरे यांनी आयोगाकडे केली आहे.

काही उमेदवार गेल्या चार-पाच वर्षांपासून अभ्यासाची तयारी करीत आहेत. कोरोनामुळे त्यांचे एक वर्ष वाया गेले आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीसह वय वाढणे, मानसिक त्रास, करिअरमध्ये कमी झालेल्या संधी या कारणाने पुन्हा परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे आयोगाने याबाबत सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. गेल्या दोन वर्षांत परीक्षा झालेली नसल्याने परीक्षेसाठीचे वय वाढविल्यास फायदा होईल, त्यामुळे याचा विचार करणे गरजेचे आहे.

पूर्व परीक्षेतील गुण हे स्पर्धा परीक्षेमध्ये ग्राह्य धरले जात नाहीत, ही परीक्षा केवळ चाळणी म्हणूनच उपयुक्त आहे. केंद्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये देखील पूर्व परीक्षेतील उत्तीर्णाचे प्रमाण १ : २५ असेच आहे. एमपीएससीद्वारे घेतल्या जाणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी पूर्व सेवा या परीक्षेत हेच उत्तीर्णतेचे प्रमाण १ : १४ ऐवजी १ः२५ करणे अपेक्षित आहे, असे बडे व निंभोरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आनंदाची बातमी! नागरिकांना घरबसल्या मिळणार दस्ताची प्रमाणित प्रत; राज्यभर राबवण्यात येणार, नेमकी काय आहे सुविधा?

Mumbai Crime: मुंबईत रागातून २ अल्पवयीन मुलांनी मित्राला संपवलं, नंतर हातपाय धुवून मृतदेहाशेजारीच झोपले अन्...; कारण काय?

Solapur Textile Industry: सोलापूरच्या कापड उद्योगास ५०० कोटींचा फटका; कच्चा माल महागला अन् निर्यात विस्कळित; हजार डॉलरचे शिपमेंट ५ हजारांवर!

Latest Marathi News Live Update : भिवंडीतील कोनगाव येथे भंगार गोदामाला भीषण आग; दोन गोदाम जळून खाक

4 वर्ष अमेरिकेत राहून मृणाल दुसानिस भारतात का परतली? म्हणाली...'भारतात येण्याचा निर्णय घेतला कारण...'

SCROLL FOR NEXT